Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आता आधार असेल तरच रेल्वेच तात्काळ तिकिट – रेल्वेचा निर्णय

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 12, 2025
in बातमी
0
आता आधार असेल तरच रेल्वेच तात्काळ तिकिट – रेल्वेचा निर्णय
       

मुंबई – रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. या प्रक्रियेमध्ये 3 मोठे बदल केल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. यामध्ये भारतीय रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमातील बदल 1 जुलैपासून लागू करण्याचा निर्णय घेतला असून आता आधार असेल तरच रेल्वेचे तात्काळ तिकिट काढता येणार आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे.

यंदा तात्काळ तिकिट बुकिंगच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. हे बदल 1 जुलैपासून लगू होणार आहेत. या नियमांनुसार 1 जुलैपासून आयआरसीटीसी खातं आधार प्रमाणीकरण असेल त्यांनाच तात्काळ तिकिट काढता येणार आहे. तसेच 15 जुलैपासून आधार ओटीपी द्वारे पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतर तात्काळ तिकीट बुकींग करता येणाक आहे. तात्कळ तिकिट बुकिंगमध्ये फार मोठी हेराफेरी केली जात होती. तसेच या प्रक्रियमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार केला जात होता. अशा तक्रारी प्रवाशांकडून सातत्यानं केल्या जात होत्या. याची दखल घेऊन अखेर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या तात्काळ तिकिटांच्या प्रक्रियेमध्ये नवे बदल जाहीर केले आहेत.

रेल्वेच्या तात्काळ तिकिट काढण्यासाठी आता 1 जूलै पासून निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रामाणिक प्रवाशांचे हित जपले जाणार आहे. यासाठीच भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट आरक्षण प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले असल्याचे सांगितले आहे. या सुधारणा प्रामाणिक प्रवाशांच्या फायद्याच्या ठरणार आहेत. आगामी काळात तिकिट काढण्याची प्रक्रिया अधिक काटेकोर होणार आहे. त्यामुळे तात्काळ तिकिटांचा काळाबाजार कमी होईल अशी सर्व सामान्य प्रवाशांना आशा आहे.


       
Previous Post

मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी १८ जुलैपासून – उच्च न्यायालय

Next Post

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात, विमानात २४२ प्रवासी

Next Post
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात, विमानात २४२ प्रवासी

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात, विमानात २४२ प्रवासी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन उत्साहात संपन्न
बातमी

पुण्यात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन उत्साहात संपन्न

by mosami kewat
April 26, 2026
0

पुणे : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन पुण्यातील कलाकार कट्टा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार...

Read moreDetails
ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ; ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ; ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

April 25, 2026
प्रबुद्ध भारतच्या वृत्तावरून वाद; नोटीस पाठवा, मग बघू जितरत्न पटाईत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर !

प्रबुद्ध भारतच्या वृत्तावरून वाद; नोटीस पाठवा, मग बघू जितरत्न पटाईत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर !

April 25, 2026
दमोह: दलित नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचून बेदम मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करत वरात अडवली

दमोह: दलित नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचून बेदम मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करत वरात अडवली

April 25, 2026
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ACB चा मोठा दणका; ५ लाखांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक गजाआड!

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ACB चा मोठा दणका; ५ लाखांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक गजाआड!

April 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home