Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात, विमानात २४२ प्रवासी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 12, 2025
in बातमी
0
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात, विमानात २४२ प्रवासी
       

अहमदाबाद | प्रतिनिधी

गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. लंडनकडे जाणाऱ्या AI 171 या विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. टेकऑफदरम्यान विमानाचा मागचा भाग एका झाडाला धडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात अहमदाबाद येथील हॉर्स कॅम्प परिसरात, सिव्हिल हॉस्पिटलच्या जवळ झाला. अपघातानंतर परिसरात काळ्या धुराचे लोट उठताना दिसले. विमान मेघाणी नगर परिसरातून धावपट्टी २३ वरून उड्डाण केले होते. त्यानंतर काही क्षणांतच ते जमिनीवर कोसळले.

या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवास करत होते. घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री व डीजीपी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. एनएसजी आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यावर एअर इंडियाचे स्पष्टीकरण आले आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, AI171 विमानाला टेकऑफदरम्यान अपघात झाला असून आम्ही घटनेची माहिती गोळा करत आहोत. अधिकृत माहिती लवकरच Air India च्या वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडल्सवर शेअर करण्यात येईल. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या अपघाताबाबत तीव्र दुःख व्यक्त करत तात्काळ बचाव आणि वैद्यकीय मदतीचे आदेश दिले आहेत. जखमी प्रवाशांसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करून उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.


       
Tags: 242 passengersAhmedabadAir Indiaboardcrashesplane
Previous Post

आता आधार असेल तरच रेल्वेच तात्काळ तिकिट – रेल्वेचा निर्णय

Next Post

राज्यातील महापालिका निवडणुका आक्टोंबरमध्ये? प्रभाग रचनेसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार

Next Post
राज्यातील महापालिका निवडणुका आक्टोंबरमध्ये? प्रभाग रचनेसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार

राज्यातील महापालिका निवडणुका आक्टोंबरमध्ये? प्रभाग रचनेसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?
बातमी

कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?

by mosami kewat
August 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या...

Read moreDetails
नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

August 5, 2026
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

August 5, 2026
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

August 5, 2026
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

August 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home