नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील पेल्हार परिसरात महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला असून, एका महिला तलाठ्याला ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. उज्वला प्रवीण पाटील (४८) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदार व त्यांच्या मामांचा चाळ बांधकामाशी संबंधित व्यवसाय आहे. त्यांनी २०१५ मध्ये मौजे बिलालपाडा येथील सर्व्हे क्रमांक १३/३ मधील जमीन खरेदी केली होती. या जागेवर न्यायालयीन वाद सुरू असतानाही चार खोल्यांचे बांधकाम तसेच माती भरावाचे काम करण्यात आले होते. (Bribe case)
Also Read : इबोला कोरोनापेक्षाही डेंजर, WHO ने घोpषित केली आंतरराष्ट्रीय आणीबाणी; परदेशातून येणाऱ्यांची आता पुणे विमानतळावर होणार तपासण
या बांधकामाची पाहणी करण्यासाठी तलाठी उज्वला पाटील घटनास्थळी गेल्या होत्या. आरोपानुसार, संबंधित बांधकाम व माती भरावाचा पंचनामा टाळण्यासाठी त्यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली. नंतर बांधकामासाठी ४५ हजार रुपये आणि माती भरावासाठी १ लाख ५० हजार रुपये, अशी एकूण १ लाख ९५ हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने पालघर एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवली.
Also Read : 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – ॲड. प्रकाश आंबेडकर
एसीबीने २१ आणि २२ मे रोजी पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सोमवारी पेल्हारगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी उज्वला पाटील यांना रंगेहात अटक केली. या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी
मनमाड : मनमाड शहरातील“रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा!” सार्वजनिक रस्त्यांना अधिकृत नाव अथवा क्रमांक देऊनच नगरपरिषदेच्या विकासकामांची...
Read moreDetails






