सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 2, 16 आणि 21 या शाळा बंद करण्याचा अथवा त्यांच्या वर्गांचे स्थलांतर करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर तीनही शाळा मागील सुमारे 60 वर्षांपासून कार्यरत असून या शाळांमधून मागासवर्गीय तसेच सर्वसामान्य समाजातील हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. (Solapur Municipal Schools)
या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून उच्च पदे भूषविली आहेत. शाळांच्या इमारती प्रशस्त असून विद्यार्थ्यांसाठी मोठे मैदानही उपलब्ध आहे. या शाळा मागासवर्गीय बहुल भागात स्थित असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांचे मोठे महत्त्व आहे. शाळा बंद झाल्यास अथवा वर्गांचे जय भवानी येथील शाळेत स्थलांतर झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Also Read : वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार
त्यामुळे शाळा क्रमांक 2, 16 व 21 या शाळा सुरू ठेवाव्यात आणि त्यांच्या वर्गांचे स्थलांतर करू नये, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीने आयुक्तांकडे केली आहे. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा शहराध्यक्ष महेश जाधव, सचिव नरेंद्र शिंदे, सहसचिव चंद्रकांत सुरवसे, राहुल शिंदे, विनोद जाधव, रवि कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Solapur Municipal Schools)
सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम
पुणे : अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटन भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव जी महाराज (पुणे) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते....
Read moreDetails





