Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मग आम्ही बी टीम कसे? ‘मतचोरी’च्या आरोपांवरून वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसवर हल्लाबोल; ‘कोर्टात जाण्याची हिंमत का नाही?’

mosami kewat by mosami kewat
August 25, 2025
in बातमी
0
मग आम्ही बी टीम कसे? ‘मतचोरी’च्या आरोपांवरून वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसवर हल्लाबोल; ‘कोर्टात जाण्याची हिंमत का नाही?’
       

मुंबई : देशभरात आणि राज्यात सुरू असलेल्या ‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन युवा आघाडीने काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार पलटवार केला आहे. वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून, निवडणूक घोटाळ्यासाठी वंचित आघाडीला ‘बी टीम’ म्हणणे हा निव्वळ अपप्रचार असल्याचे म्हटले आहे.

राजेंद्र पातोडे यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे गंभीर आरोप केले असले, तरी ते किंवा त्यांचे राज्यातील नेते न्यायालयात याचिका दाखल करायला का तयार नाहीत, असा सवाल पातोडे यांनी विचारला आहे. महाराष्ट्रात एक कोटी ‘रहस्यमय मतदार’ असल्याचा दावा करूनही, काँग्रेसने केवळ आंदोलनात्मक मोहीम चालवली आणि न्यायालयाचा मार्ग का निवडला नाही, यावर त्यांनी बोट ठेवले.

मताची चोरी सत्ताधाऱ्यांकडूनच शक्य

निवडणुका मॅनेज करणे, बोगस मतदारांची नोंदणी करणे किंवा ईव्हीएममध्ये गैरव्यवहार करणे हे केवळ सत्ताधारी पक्षांनाच शक्य आहे. आम्ही तर केंद्रात किंवा राज्यात सत्तेत नव्हतो, मग आम्हाला ‘बी टीम’ कसे म्हटले जाते, असा सवाल पातोडे यांनी केला. ते म्हणाले, “वंचित आघाडीवर ‘बी टीम’ असल्याचा आरोप मुद्दाम केला जातो, जेणेकरून बोगस मतदार, मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळ्यासारखे गंभीर मुद्दे लोकांसमोर येऊ नयेत.”

भाजप-काँग्रेस एकमेकांच्या ‘बी टीम’

राजेंद्र पातोडे यांनी पुढे म्हटले की, जर काँग्रेसकडे निवडणुकीतील गैरव्यवहाराचे पुरावे असतील, तर त्यांनी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली नाही? ईव्हीएमचा मुद्दा न्यायालयात आल्यास निकाल बदलतो, हे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना चांगलेच माहीत आहे, म्हणूनच ते न्यायालयीन लढाई टाळत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मते, भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष कधी एकमेकांचे ‘बी टीम’ म्हणून काम करतात. पातोडे म्हणाले, “देशात आणि राज्यात भाजप कधी काँग्रेसची ‘बी टीम’ म्हणून काम करते, तर कधी काँग्रेस भाजपची ‘बी टीम’ असते. बाकीच्या सर्व गोष्टी केवळ अंधश्रद्धा आहेत.”

निवडणुका जिंकणारी महायुती आणि हारणारी महाविकास आघाडी, यांच्या अपयशासाठी वंचित बहुजन आघाडीला जबाबदार धरणे हे चुकीचे असून, हे एक उघड सत्य आहे की निवडणुका मॅनेज पद्धतीने, बोगस मतदारांच्या आधारे होत असतील तर वंचित बहुजन आघाडीला ‘बी टीम’ म्हणणे हे तर्कहीन आहे, असे राजेंद्र पातोडे यांनी ठामपणे सांगितले.


       
Tags: Anjali AmbedkarbjpCongresElectionElection commissionindiaMaharashtrapoliticsPrakash AmbedkarSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindiavote
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर ॲट्रॉसिटी दाखल करा; वंचित बहुजन आघाडी

Next Post

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटील यांना सवाल; गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का?

Next Post
प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटील यांना सवाल; गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का?

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटील यांना सवाल; गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा
बातमी

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

by mosami kewat
July 22, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री...

Read moreDetails
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

July 22, 2026
दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

July 22, 2026
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

July 22, 2026
२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

July 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home