Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबादमध्ये ‘वंचित’चे महाशक्तीप्रदर्शन! मुफ्ती-मौलवींनी मित्र जोडायला शिकावे, तरच भाजप-आरएसएसला रोखता येईल – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
January 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबादमध्ये ‘वंचित’चे महाशक्तीप्रदर्शन! मुफ्ती-मौलवींनी मित्र जोडायला शिकावे, तरच भाजप-आरएसएसला रोखता येईल – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज वंचित बहुजन आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक आमखास मैदानावर आयोजित भव्य जाहीर सभेत जनसागराचा महापूर लोटला होता. या सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांवर घणाघाती टीका करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात प्रस्थापित मुस्लिम नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, औरंगजेबाचा प्रश्न असो किंवा हिजाबचा मुद्दा या दोन्ही प्रसंगी एक तरी नगरसेवक मुस्लिमांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला का? मुस्लिम नगरसेवकांनी मोर्चे काढले का? उत्तर प्रदेशात मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर चालवले गेले, तेव्हा त्याविरोधात एकही मुस्लिम नगरसेवक औरंगाबाद मध्ये रस्त्यावर उतरला का? अशा शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले.

धार्मिक नेतृत्वावर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकीत मौलवी, मुफ्ती आणि मुस्लिम संघटन जे मुस्लिमांच्या बाजूने उभे राहिले त्यांच्याच बाजूने उभे राहिले पाहिजे ही भूमिका ते का घेत नाहीत.

मुफ्ती, मौलवींनी मित्र जोडायला शिकावे तेव्हाच आरएसएस आणि भाजपला तोंड देऊ शकाल. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

भाजपवर ‘बदलापूर’ प्रकरणावरून टीका 

भाजपला मतदान करू नका, कारण व्यभिचाऱ्यांना भाजप स्वीकृत नगरसेवक करत आहे. बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले आहे. असा व्यक्ती आरएसएस व भाजप कार्यकर्त्यांच्या घरी येईल. यामुळे आरएसएस आणि भाजपचे कार्यकर्तेही असुरक्षित झाले आहेत. अशी  टीका त्यांनी केली.

मोदींच्या धोरणांमुळे देश संकटात :

नरेंद्र मोदी आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा थेट परिणाम देशातील सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय मंचावर मोदी सरकारमुळे देशाची झालेली दुरावस्था याकडे लक्ष वेधत, मोदींना धडा शिकवायचा असेल तर भाजपला मतदान करू नका, असे आवाहन करण्यात आले.

औरंगाबाद महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

औरंगाबादमध्ये जनसागर उसळला :

सायंकाळी झालेल्या या सभेसाठी शहरातील कानाकोपऱ्यातून नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. आमखास मैदान जनसमुदायाने पूर्णपणे ओसंडून वाहत होते. ‘जय भीम’ आणि ‘वंचित बहुजन आघाडीचा विजय असो’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

यावेळी या जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेने निवडणुकीच्या वातावरणात मोठी चुरस निर्माण केली आहे. या सभेला स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


       
Tags: aurangabadElectionElection commissionElection newsMaharashtraMaharashtra politicsPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

नांदेड प्रचारात आक्षेपार्ह वक्तव्य; अशोक चव्हाण अडचणीत, वंचितचे ॲड.डॉ. अरुण जाधव आक्रमक !

Next Post

मतदारांनी प्रलोभनांना बळी पडू नये : ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
मतदारांनी प्रलोभनांना बळी पडू नये : ॲड. प्रकाश आंबेडकर

मतदारांनी प्रलोभनांना बळी पडू नये : ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home