औरंगाबाद : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना योगेश बन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या अभिवादन कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे, पी. के. दाभाडे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, युवा शहराध्यक्ष संदीप जाधव, युवा जिल्हा महासचिव सतीश शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, पश्चिम शहर उपाध्यक्ष शाहीर मेघानंद जाधव, करूणा जाधव, अजय मगरे, एस. पी. मगरे, रवी रत्नपारखे आदी उपस्थित होते.
पुस्तक परीक्षण -जीवन चलने का नाम
मनुष्य आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आयुष्यभर पळत असतो. या धावपळीच्या जीवनामध्ये जणू काही तो स्वतःला विसरून जातो, आपल्याला काय आवडतं?...
Read moreDetails