Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

भाजपच्या पायाखालची वाळू सरकली – ॲड.प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 12, 2024
in Uncategorized
0
भाजपच्या पायाखालची वाळू सरकली – ॲड.प्रकाश आंबेडकर
0
SHARES
171
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

जनतेला घाबरवण्याचा प्रयत्न : ॲड.प्रकाश आंबेडकर

पुणे : काल देशभरात साडेचारशे ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. त्या धाडी राजकीय नव्हत्या, तर अराजकीय होत्या. या धाडी टाकण्याचे कारण म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते कितीही म्हणत असतील की, आम्ही चारशे प्लस जागा जिंकणार आहोत, तर ते भीतीपोटी आहे. भीती निर्माण व्हावी म्हणून ते राजकीय आणि अराजकीय (व्यापारी) यांच्यावर देखील धाडी टाकत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.

भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदवण्यासाठी आले असताना त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. भाजप ही भयग्रस्त झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार करून लोकांनाही भयग्रस्त करून आपल्याला जिंकता येतंय का? अशी त्यांची खेळी आहे. म्हणून राजकीय नेते, व्यापारी यांच्यावर धाडी सुरू झाल्या आहेत. आम्ही सर्वसामान्य लोकांना असे विचारतो की, तुम्हाला हे अपेक्षित आहे का? भीती निर्माण करण्यासाठी धाडी हे यंत्र भाजप वापरत असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. महाराष्ट्र कधीही इतका वादग्रस्त नव्हता. या ठिकाणी स्टेबल सरकार चालत होतं. सध्या पक्ष फोडणं, गोळीबार करणं, धमकावणं हे फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे मराठी माणसाच्या मानसीकतेला झेपणारं नाही. तो त्याच्याशी सहमत नाही. त्यामुळे तो इलेक्शनची वाट पाहत आहे, असेही ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सोपवला यावर प्रतिक्रिया देताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, आमच्या पक्षात मंत्री होते, आमदार होते ते निघून गेले. पण, पक्ष म्हणून काही परिणाम झाला नाही. एखाद्याचे पक्ष सोडून जाणे हे धक्कादायक असते. मात्र, त्याने पक्षावर काही परिणाम होतो असे मला वाटत नाही. नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे नेते चौकशी खाली आहेत, त्यांना ते नाचवणार आहेत. उच्च नेते किंवा त्याखालील नेते यांनाही ते नाचवणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

भीमा कोरेगाव दंगल पोलिसांनी घडवली –

भीमा कोरेगाव दंगल पोलिसांनी घडवली आहे. आयोगासमोर हा विषय वळवण्याचा प्रयत्न होत होता आणि ते माझ्या तोंडून वदवून घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून मी आयोगाला म्हटलं की, मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी दिली आहे. आता मी थांबतो. अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.


       
Tags: Bhima KoregaobjpMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मिस्टर अँड मिसेस आंबेडकरांचा साधेपणा !

Next Post

महाविकास आघाडी मजबूत राहील!

Next Post
महाविकास आघाडी मजबूत राहील!

महाविकास आघाडी मजबूत राहील!

जुन्नरमधील रहस्यदाट मृत्यू प्रकरण! श्रीगोंद्याच्या तलाठीसह कॉलेज तरुणीचा मृतदेह सापडला — रिव्हर्स वॉटरफॉलजवळ चपला आढळल्याने खळबळ
बातमी

जुन्नरमधील रहस्यदाट मृत्यू प्रकरण! श्रीगोंद्याच्या तलाठीसह कॉलेज तरुणीचा मृतदेह सापडला;रिव्हर्स वॉटरफॉलजवळ चपला आढळल्याने खळबळ

पुणे : जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध रिव्हर्स वॉटरफॉल परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्रीगोंद्याचे तलाठी आणि एक कॉलेज तरुणी ...

June 24, 2025
Maharashtra State Road Transport Corporation : प्रवाशांना दिलासा! १५ ऑगस्टपासून 'लालपरी'चे लाईव्ह लोकेशन पाहता येणार
बातमी

Maharashtra State Road Transport Corporation : प्रवाशांना दिलासा! १५ ऑगस्टपासून ‘लालपरी’चे लाईव्ह लोकेशन पाहता येणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अर्थात एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.आता एसटीसाठी तासन्तास वाट पाहण्याचा अनावश्यक ...

June 24, 2025
"युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला! इस्राइल-इराण संघर्ष आटोपला, पण अखेरच्या हल्ल्यात इराणचा इशारा ठळक"
Uncategorized

“युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला! इस्राइल-इराण संघर्ष आटोपला, पण अखेरच्या हल्ल्यात इराणचा इशारा ठळक”

मधपूर्वेतील तणावाने पुन्हा एकदा उंची गाठल्यानंतर अखेर इस्राइल आणि इराणमधील थेट संघर्ष आटोपल्याचे संकेत मिळाले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू ...

June 24, 2025
पुण्यातील पालखी सोहळ्यात ‘एआय’ कॅमेऱ्यांनी मोजली गर्दी; तब्बल १२.५४ लाख वारकऱ्यांची नोंद!
Uncategorized

पुण्यातील पालखी सोहळ्यात ‘एआय’ कॅमेऱ्यांनी मोजली गर्दी; तब्बल १२.५४ लाख वारकऱ्यांची नोंद!

पुणे : आषाढी वारीच्या निमित्ताने पुण्यातील पालखी सोहळ्याला यंदा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली. शहरात प्रथमच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) तंत्रज्ञानावर आधारित ...

June 24, 2025
Akola : अंजलीताई आंबेडकर यांच्या संवाद दौऱ्यासंदर्भात अकोला जिल्हा बैठक संपन्न
बातमी

Akola : अंजलीताई आंबेडकर यांच्या संवाद दौऱ्यासंदर्भात अकोला जिल्हा बैठक संपन्न

अकोला : जिल्ह्यातील येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर पंचायत, नगरपालिका इत्यादी निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई ...

June 24, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क