Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 19, 2024
in राजकीय
0
सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना हमीभाव देणार

वर्धा ः सरकारकडून सुरू असलेले दडपशाहीचे धोरण निवडणुका जवळ येतील, तसे आणखी वाढणार आहे. त्यामुळे काहीजण भाजपच्या गोटात जाणार आहेत. राजकीय नेत्यावर सुरु असलेल्या ईडी, सीबीआयचे छापेयापा-यांवरही पडणार आहेत. त्यामुळे व्यापा-यांनी सावध रहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वर्धा येथे आयोजित महाएल्गार सभेत ते बोलत होते. या महाएल्गार सभेला मोठा जनसागर उसळला होता. त्यामुळे राज्यभर या सभेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भाजपच्या गोटात जाणा-यांबद्दल आंबेडकर म्हणाले की, तुम्ही खुशाल जा. लाज लज्जा अजिबात ठेवू नका. पण, कुटुंबाला तुरुंगात जाण्यापासून वाचवा, असा उपरोधिक टोलाही लगावला आहे.मोदी सरकारला आव्हान देताना आंबेडकर म्हणाले, मोदी म्हणत आहेत की, आमच्या 400 जागा निवडून येतील. पण, आजच्या परिस्थितीत 150 जागा निवडून आणून दाखवा. भारत सोडून गेलेल्या नागरिकांची माहिती देखील त्यांनी उघड केली. आंबेडकर म्हणाले, 24 लाख कुटुंबे भारताचे नागरिकत्व सोडून गेली आहेत. ज्यांची स्थावर मालमत्ता 100 कोटींच्या आसपास होती. यात मुस्लीम आणि ख्रिश्चन नाहीत. ते सगळे हिंदू आहेत आणि यांचाच प्रचार आहे की, हिंदूचे सरकार आले पाहिजे. मग हे लोक भारत सोडून का गेले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चौफेर फटकेबाजी करताना आंबेडकर म्हणाले की, सध्या धाडी घालण्यासाठी राजकीय नेत्यांचा नंबर लागला आहे. परत मोदी सत्तेत आले, तर तुमचा नंबर आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आता पैसे आणि मतदान करा त्यांना. पण तो जिंकून आला, तर ईडी तुमच्या बोकांडीवर बसल्याशिवाय राहणार नाही. यामुळे मतदान करण्याच्याआधी विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

आंबेडकर म्हणाले की, या निवडणुकीत लोकशाहीसह संविधान वाचवलं पाहिजे. यासाठी मतदाराने लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी मी माझं मत भाजपविरोधी टाकणार असं गल्लोगल्ली, चौकाचौकात जाऊन सांगायला पाहिजे, अशी भावनिक सादही त्यांनी जनसमुदायाला घातली.

महाराष्ट्रातच नाहीतर देश पातळीवर सध्या शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या मुद्द्याने सरकारला वेठीस धरले आहे. मात्र, आंबेडकर म्हणाले की, हमीभावाचा कायदा करा असे आमचे म्हणणे आहे. जेणेकरून या कायद्याचं उल्लंघन केले तर त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करता येईल. पण, हे सरकार लालाचं आहे. सामान्य माणसाचं नाही. यामुळे हे सरकार याकडे लक्ष देत नाही. मात्र, ज्या दिवशी सत्ता आपल्या हाती येईल, त्यादिवशी हमीभावाचा कायदा केल्याशिवाय राहणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी नागरिकांना दिले आहे.


       
Tags: Mahaellagar sabhaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadiwardha
Previous Post

आम्हाला सत्ता द्या, आम्ही हमीभावाचा कायदा करतो – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

शिवजयंतीचे औचित्य साधून ‘वंचित’ ने केले माँ जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन !

Next Post
शिवजयंतीचे औचित्य साधून ‘वंचित’ ने केले माँ जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन !

शिवजयंतीचे औचित्य साधून 'वंचित' ने केले माँ जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन !

महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर
बातमी

महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर

बोधगया, बिहार : काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहाराला भेट दिली. राहुल गांधींच्या महाबोधी मंदिर ...

June 7, 2025
विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?
Uncategorized

विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?

पुणे - आकाश शेलार भारत-पाकिस्तान संघर्ष असतो तेव्हा देशभरात गर्जना होते ‘जवाब दो, घुसून मारा’ पण जेव्हा देश खरंच घुसून ...

June 7, 2025
राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू
बातमी

राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 नवे रुग्ण सापडले असून ...

June 7, 2025
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे
बातमी

मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे

मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदार व महापालिका अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी ईडीने ...

June 7, 2025
रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर
बातमी

रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर

रायगड - किल्ले रायगडावर काल दि 6 जून रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 352 वा शिवराज्याभिषेक मोठ्या ...

June 7, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क