Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

जो पक्ष लोकसभेत किमान 14 जागा ओबीसींना देईल तो आपला पक्ष.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 29, 2024
in राजकीय
0
जो पक्ष लोकसभेत किमान 14 जागा ओबीसींना देईल तो आपला पक्ष.
       

प्रकाश आंबेडकरांचा ओबीसींना दिला राजकीय मित्रपक्ष ओळखण्याचा सल्ला !

माढा : आपला राजकीय मित्र पक्ष ओळखायचा असेल, तर राखीव जागा सोडून उद्याच्या लोकसभेत ओबीसींना कोण जास्त उमेदवारी देत आहे ते महत्वाचं आहे. जो पक्ष लोकसभा निवडणुकीत ओबीसींना किमान 14 ठिकाणी उमेदवारी देईल तो आपला पक्ष असेल असा मंत्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी माढा येथे झालेल्या ओबीसी परिषदेत ओबीसींना दिला आहे.

एक-दोन मंत्री राहून दोन चार खासदार निवडून दिले तर फारसा फरक पडत नाही त्यांचा आवाज कोणी ऐकत नाही. जोपर्यंत आपण मोठ्या संख्येने जात नाही तोपर्यंत निर्णय प्रक्रियेवरती आपला ताबा राहत नाही.

भाजप हा बेभरवशाचा पक्ष आहे. भाजपवर आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. म्हणून, ज्या पक्षावर विश्वास ठेवता येत नाही. त्या पक्षाला आपण मतदान करायचं नाही. ही खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठा आरक्षण निर्णयावर भाष्य करताना ॲड. अबेडकारांनी म्हटले की, भाजप म्हणत होतं की, आम्ही ओबीसींच्या बाजूने आहोत. आम्ही त्यांचं नुकसान होऊ देणार नाही, असे ते म्हणत होते. पण, काल ते काहीच करू शकले नाहीत. एकनाथ शिंदे यांना जे करायचं होतं, ते त्यांनी केलं. देवेंद्र फडणवीस मात्र गप्प बसले.

संविधान बदलण्याच षडयंत्र भाजप करत आहे. कारण, संविधान केवळ शिक्षणातलं आरक्षण देत नाही, नोकऱ्यांमधील आरक्षण नाही, तर 6.50 कोटी जे महाराष्ट्राचे बजेट आहे त्यातील 27 टक्के हिस्सा ओबीसीला गेला पाहिजे. असेही आपले संविधान सांगते. भाजप करत असलेला धर्माचा कांगावा हा एक प्रकारचा डाव आहे. आरक्षणवादींच्या आरक्षणावरती यांना डल्ला मारायचा असल्याचे मत त्यांनी मांडले.

जो पक्ष आरक्षणवाद्यांना मातीत घालायला निघाला आहे. त्या पक्षाला आपण सत्तेतून दूर करणार आहोत की नाही ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी म्हटले की, यांना दूर करणार नसाल, तर तुम्ही मातीत जालं. तुमच्या नंतरच्या पिढ्या सुद्धा तुम्ही मातीत घालालं.

आंदोलनातून आणि सभेतून जागृती होते. पण, निर्णय हा विधानसभा आणि लोकसभेमधून घेतला जातो. विधानसभा आणि लोकसभेत आरक्षणवादी पोहचलाच नाही, तर त्यांच्या हिताचं कोण बोलणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.

उद्याच्या निवडणुकीत आपण आरक्षणवादीचं राहिलं पाहिजे. म्हणून तुम्ही म्हटलं पाहिजे की, माझं मत हे आरक्षणवाद्यालाचं असेल. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.


       
Tags: madhaMaharashtraobcPrakash AmbedkarreservationVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ मुंबईमधून लोकसभेच्या 2 जागा लढणार ?

Next Post

खोट्या बातम्या पेरणाऱ्या पत्रकारांवर वंचित गुन्हा दाखल करणार !

Next Post
खोट्या बातम्या पेरणाऱ्या पत्रकारांवर वंचित गुन्हा दाखल करणार !

खोट्या बातम्या पेरणाऱ्या पत्रकारांवर वंचित गुन्हा दाखल करणार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध "खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!"
बातमी

गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”

by Tanvi Gurav
July 17, 2025
0

गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...

Read moreDetails
UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

July 17, 2025
सानपाडा येथील बस स्थानकासमोर कित्येक महिन्यांपासून उघड्यावर असलेला धोकादायक चेंबर अखेर झाकण्यात आला आहे. या खुल्या चेंबरमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता. वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई आणि पत्रकार विष्णू बुरे, सचिन पुटगे व रंजित तायडे यांनी या समस्येकडे लक्ष वेधत एक वेगळी पद्धत अवलंबली. त्यांनी चेंबरच्या ठिकाणी अनोख्या पद्धतीने पूजा करून प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाची दखल घेत संबंधित विभागाने तत्काळ कारवाई करत काल रात्री चेंबरवर झाकण बसवले. या सकारात्मक निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, वंचित बहुजन आघाडी व सजग पत्रकारांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संबंधित विभागाचे मनःपूर्वक आभार तसेच जागरूक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सानपाड्यातील धोकादायक चेंबरला झाकण बसवले; वंचित बहुजन आघाडी व पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश

July 17, 2025
कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

July 17, 2025
सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

July 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home