Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पांढरीतील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 12, 2024
in बातमी
0
पांढरीतील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला
       

ॲड. प्रकाश आंबेडकरांची घटनास्थळी भेट !

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील पांढरी येथील महापुरुषांच्या प्रवेशद्वाराचा वाद चिघळला आहे. प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 7 मार्चपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु होते. या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली.कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार झाल्याचीही माहिती आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणावर भाष्य करताना म्हटलं की, “कमानीच्या संदर्भात गावात ठराव झाल्यानंतर अचानकपणे आमची सभा झाल्यानंतर हे असं होतंय तर याच्यामागे राजकारण आहे याची आम्हाला जाणीव आहे. पण आम्हाला त्या राजकाणाचा भाग व्हायचं नाहीये. गावात आणि जिल्ह्यामध्ये शांतता राहायला हवी.”

आंबेडकर पुढे म्हणाले, “दोन्ही गटांमध्ये काही निर्णय न होता डीपीडीसीमध्ये तो व्हावा आणि ती कमान शासनच बांधेल असं व्हावं, असं मी जिल्हाधिकाऱ्यांना बोललोय. कालच्या मोर्चात गावातले किती आणि बाहेरचे किती लोक होते, हाही अँगल तपासावा अशी विनंती मी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

“हे लोकसभा निवडणूक बघून काही जणांनी वातावरण बिघडावं अशा स्वरुपात केलेलं आहे का? ते नेमकं कुणी केलंय? ते मी शोधून काढायला सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण गढूळ व्हावं, यासाठी यात कुणाची भूमिका आहे का? हे तपासायला हवं.”


       
Tags: amravatiDr. Babasaheb AmbedkarPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

काँग्रेसने ‘मविआ’ कडे मागणी केलेल्याजागांवर चर्चेसाठी ‘वंचित’ ने दिला प्रस्ताव

Next Post

खोटे बोलत नसाल तर २४ तासांत १५ जागा घोषित करा

Next Post
खोटे बोलत नसाल तर २४ तासांत १५ जागा घोषित करा

खोटे बोलत नसाल तर २४ तासांत १५ जागा घोषित करा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य ‘महा आरोग्य शिबीर’ उत्साहात संपन्न!
बातमी

औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य ‘महा आरोग्य शिबीर’ उत्साहात संपन्न!

by mosami kewat
December 9, 2025
0

औरंगाबाद : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रभाग क्र. २४ येथे वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष...

Read moreDetails
‘सत्य सर्वांचे आदी घर’ रुजवणारे डॉ. ‘बाबा’ हरपले! हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

‘सत्य सर्वांचे आदी घर’ रुजवणारे डॉ. ‘बाबा’ हरपले! हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

December 9, 2025
भूषण गवईचा आरक्षणावरचा विषारी हल्ला अर्थात संवैधानिक द्रोह

भूषण गवईचा आरक्षणावरचा विषारी हल्ला अर्थात संवैधानिक द्रोह

December 9, 2025
औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

December 9, 2025
‘सत्य सुखाला आधार…’ जपणारे; कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ, सामाजिक न्यायासाठी लढणारे डॉ. बाबा आढाव यांचे निधन!

‘सत्य सुखाला आधार…’ जपणारे; कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ, सामाजिक न्यायासाठी लढणारे डॉ. बाबा आढाव यांचे निधन!

December 8, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home