Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्य सरकारला मोठा दणका! RTE मधील ‘१ किमी अट’ हायकोर्टाकडून स्थगित; वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत

mosami kewat by mosami kewat
March 9, 2026
in बातमी
0
राज्य सरकारला मोठा दणका! RTE मधील ‘१ किमी अट’ हायकोर्टाकडून स्थगित; वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत
       

अकोला : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमधील प्रवेशासाठी राज्य सरकारने लागू केलेली ‘१ किलोमीटर अंतराची अट’ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. या निर्णयामुळे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील हजारो विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये प्रवेशाचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे. या निर्णयाचे वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत करण्यात आले असून, न्यायालयीन लढाई लढणारे ॲड. बोधी रामटेके आणि ॲड. दीपक चटप यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. मात्र, राज्य सरकारने अलीकडेच नवीन नियम लागू करत विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर परिसरातील शाळाच निवडण्याची अट घातली होती. या नियमानुसार, जर विद्यार्थ्याच्या घराजवळ १ किलोमीटरच्या परिसरात सरकारी शाळा उपलब्ध असेल, तर त्या विद्यार्थ्याला खासगी शाळेत प्रवेश मिळणार नाही, अशी तरतूद करण्यात आली होती. या नियमामुळे अनेक गरीब व वंचित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळण्याची संधी हिरावली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या ‘जाचक’ नियमाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या १ किलोमीटर अंतराच्या नियमाला स्थगिती दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सभागृहात या नियमाबाबत दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोपही पुढे आला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे पालकांवरील निवड प्रक्रियेचे बंधन शिथिल झाले असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.

या निर्णयाचे स्वागत करत वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. “राज्य सरकार सातत्याने शिक्षण हक्क कायद्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. १ किलोमीटरची अट लादून गरीब मुलांना दर्जेदार शिक्षणापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न होता. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे वंचित समाजातील विद्यार्थी आणि पालकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे,” असे राजेंद्र पातोडे यांनी सांगितले.


       
Tags: MaharashtraRTEVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण

Next Post

पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने

Next Post
पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने

पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 
बातमी

अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 

by mosami kewat
July 31, 2026
0

अकोला: वंचित बहुजन आघाडी प्रदेश कार्यकारिणी निवडणुक गुरुवार, ३० जुलै रोजी पार पडली. अकोला शहरातील अशोक वाटिका येथील मतदान केंद्रावर...

Read moreDetails
सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी सदस्य नोंदणी; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी सदस्य नोंदणी; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

July 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार

July 30, 2026
औरंगाबाद मनपा सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

औरंगाबाद मनपा प्रभाग सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

July 30, 2026
देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

July 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home