राहुरी : राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष एकनाथ चोळके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अरुण जाधव यांनी विरोधकांवर तीव्र टीका करत विविध सामाजिक प्रश्न उपस्थित केले.
मुस्लिम समाजाला उद्देशून त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, “किती दिवस फसवणूक सहन करणार? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष तुमचं संरक्षण करू शकत नाहीत, ते रस्त्यावरही उतरू शकत नाहीत.” जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचा आरोप करत, “महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर असून तक्रारीही घेतल्या जात नाहीत,” असे त्यांनी सांगितले.
तसेच आदिवासी व अनुसूचित जातींच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप करत, “या प्रश्नांवर एकही प्रस्थापित नेता बोलत नाही; वंचित बहुजन आघाडीच या मुद्द्यांवर लढत आहे,” असे ते म्हणाले.
शेवटी त्यांनी मतदारांना आवाहन करत, “गरीब मराठा समाजातील उमेदवार संतोष चोळके यांना मोठ्या मतांनी विजयी करा,” असे आवाहन केले.






