पुणे : ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व जलसाठवण बांधकामे आता जिओ-टॅगिंग केली जात आहेत. याचा अर्थ, या प्रकल्पांचे प्रत्यक्ष जागेवर फोटो काढून त्यांची अचूक ठिकाणे निश्चित केली जात आहेत. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची सविस्तर आणि एकत्रित माहिती उपलब्ध होईल.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत कृषी, वन, जिल्हा परिषद, जलसंधारण आणि जलसंपदा या सर्व संबंधित विभागांना आपापल्या पातळीवर हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण १ लाख २० हजार २१३ जलसाठवण रचना आहेत, ज्यापैकी आतापर्यंत १० हजार ३२९ पेक्षा जास्त रचनांचे जिओ-टॅगिंग पूर्ण झाले आहे.
या उपक्रमामुळे शेततळ्यांपासून ते मोठ्या धरणांपर्यंत असलेल्या सर्व जलसाठवण बांधकामांची एकत्रित आणि अद्ययावत माहिती गोळा करणे. यामुळे प्रत्यक्षात किती बांधकामे अस्तित्वात आहेत, त्यातील पाण्याची साठवण क्षमता किती आहे आणि त्यांचे नेमके ठिकाण कुठे आहे, याची स्पष्ट माहिती मिळेल. जलसंधारण विभागाने यासाठी एक विशेष ॲप तयार केले आहे आणि हे काम पूर्ण करण्यासाठी जलसंधारण, कृषी, वनविभाग आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे.
जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील १,८१४ गावांमध्ये ही कामे सुरू आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी, कृषी विभागाकडे सर्वाधिक जलसाठवण रचना असल्याने, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या पडताळणीचे काम प्राधान्याने पूर्ण करावे असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील जलसाठवणूक व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता येईल अशी अपेक्षा आहे.
हैदराबाद विमानतळावर बॉम्बच्या धमक्या! तीन आंतरराष्ट्रीय विमाने ‘हाय अलर्ट’वर; सुरक्षा यंत्रणांची कसून तपासणी
हैदराबाद : इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo Airlines) फ्लाइट रद्द होण्याच्या संकटातून प्रवासी अद्याप सावरले नसतानाच, आता एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक...
Read moreDetails






