Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

तुमची लढाई लढण्यासाठी कुकर समोरील बटण दाबा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 28, 2024
in राजकीय
0
तुमची लढाई लढण्यासाठी  कुकर समोरील बटण दाबा
0
SHARES
70
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे अकोल्यातील जनतेला आवाहन

अकोला : आरएसएसला आम्ही अंगावर घेऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचे आहे. तुमच्या मतांनी मी सभागृहात जाऊ शकतो आणि तुमची लढाई मी लढू शकतो, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रेशर कुकर या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन अकोल्यातील जनतेला केले आहे. अकोल्यातील प्रचार सभेत ते बोलत होते. सभेला हजारोंच्या संखेने नागरिक उपस्थित होते.

औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवून दंगलीचा माहोल आम्ही 2 ते 3 तासात संपवून टाकला ही वस्तुस्थिती असल्याचेही आंबेडकर यांनी या वेळी सांगितले.

एक वेळ होती की, महाराष्ट्र या देशाला राजकारण आणि समाजाचा व्यवहार कसा असावा हे शिकवत होता. १९६० मध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी बाजार समितींचे गठण हे कायदेशीररीत्या केले. आणि त्यामध्ये म्हटले की, शेतकऱ्यांचा माल हा बाजार समितींमध्ये विकला गेला पाहिजे. असा इतिहासाचा दाखलाही आंबेडकर यांनी दिला.

आंबेडकर म्हणाले की, नागरिकत्वाच्या मुद्द्याला धरून जो NRC आणि CAA आला आहे. हा असंविधानिक आहे. संविधान म्हणते की, जो या देशात जन्माला आला तो भारतीय नागरिक आहे, त्याला कोणता पुरावा देण्याची गरज नाही. आता हे सरकार कागद मागत आहे. याचा अर्थ हा आहे की, तुमच्याकडे कागद आहेत, तर तुम्ही नागरिक आहात. तुमच्याकडे कागद नसेल, तर तुम्ही तुरुंगात जाल. ही लढाई बाहेरून लढली जाऊ शकत नाही, काही लोक म्हणतात की, आम्ही न्यायालयात जाणार. न्यायालय फक्त एवढच सांगू शकते की, हा कायदा संविधानिक आहे किंवा नाही. पण हा कायदा रद्द करायचा असेल, तर संसदच ते करू शकते, त्यासाठी कोणीतरी संसदेत जाऊन आवाज उठवणे गरजेचे आहे.

आज ज्यांच्या मनात भीती आहे, त्यांना मी काही महिन्यांपासून म्हणत आहे की, लोकांना आतून बदल पाहिजे आहे. 24 लाख हिंदू परिवार 2014 पासून नागरिकत्व सोडून स्थलांतरित झाले आहेत की, ज्यांची संपत्ती 50 करोडपेक्षा कमी नाही या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मी इथल्या पक्षांना म्हणत होतो की, आता एक नवीन चेहरा दाखवणे गरजेचे आहे. एकता दाखवणे गरजेचे आहे आणि एकता अशा संघटनांची दाखवणे गरजेचे आहे की, जी कधी भाजपासोबत समझोता करणार नाही. याचीही त्यांनी आठवण करून दिली.

लोक आशा लावून होते की, हे सरकार बदल घडवेल त्यांची निराशा झाली आहे. ते मतदानाला जात नाहीत. याचा अर्थ असा आहे की, जे धर्मनिरपेक्ष नागरिक आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे की, त्यांनी १०० टक्के मतदान करावे तेव्हा बदलाला सुरुवात होईल. आपण जर भाजपला मतदान दिले, तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असे होईल. असेही त्यांनी म्हटले.

धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिमांचे प्रश्न सोडवावेत

मुस्लिमांची लढाई ही NRC, CAA आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठीची आहे. मी आशा करत होतो की, काँग्रेस आमच्यासोबत समझोता करेल तो केला नाही. पण काँग्रेस पार्टी एवढे करू शकत होती की, काही जागा या मुस्लिमांना देईल पण राजस्थान असो किंवा अन्य ठिकाणी काँग्रेस जागा देत नव्हती. मुस्लिमांच्या प्रश्नांना जोपर्यंत धर्मनिरपेक्ष पक्ष उचलत नाहीत, तोपर्यंत या देशात शांती राहणार नसल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.


       
Tags: AkolaLoksabhaMaharashtramahavikasaghadiParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोल्यातील मतदारांना सुजात आंबेडकर यांनी केले आवाहन

Next Post

अकोल्यात सामूहिक संविधान पठणाचा कार्यक्रम पार पडला

Next Post
अकोल्यात सामूहिक संविधान पठणाचा कार्यक्रम पार पडला

अकोल्यात सामूहिक संविधान पठणाचा कार्यक्रम पार पडला

मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर
बातमी

मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे - मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र युद्धानंतर भारताच्या बाजून एकही देश का उभा राहिला नाही याबाबत लोकांनी मोदी,भाजप आणि ...

June 6, 2025
आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला
बातमी

आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला

'लाडकी बहीण'साठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका, 410 कोटींचा निधी वळवला मुंबई - सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गत विधानसभा ...

June 6, 2025
फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना
बातमी

फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना

मुंबई- राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. ...

June 6, 2025
शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल
Uncategorized

शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल

रायगड - रायगडावर आज छत्रपती शिवाजी महारांचा 352वा राज्याभिषेक सोहळा साजरा गेला जात आहे. यासाठी लोखो शिवभक्तांची अलोट गर्दी किल्ले ...

June 6, 2025
देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर
Uncategorized

देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर

पुणे - देशात जातीय जनगणना सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जातीय जनगणना १ मार्च २०२७ पासून सुरू होणार ...

June 6, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क