Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

आंदोलन मुंबईतील मंत्रालयात नेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही : ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
September 18, 2025
in Uncategorized, बातमी
0
ॲड. प्रकाश आंबेडकर उद्या मालेगाव बॉम्बस्फोट पीडितांच्या कुटुंबियांची घेणार भेट!
       

संशोधक विद्यार्थ्यांच्या उपोषणावरुन सरकारवर टीक!

पुणे : पुण्यात संशोधक विद्यार्थी उपोषणाला बसले असतानाही पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही, असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आपल्या अधिकृत सोशल मीडिया (X) हँडलवरून ट्विट करत त्यांनी म्हटले की, राज्यातील सत्ताधारी म्हणतात की, आम्हाला आता संशोधकांची गरज नाही; आम्हाला त्या ठिकाणी कौशल्ये विकसित करायची आहेत. हे दुर्दैवी असून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घातक आहे.

तसेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, शासनाने समाजाच्या मागणीनुसार विविध संस्था स्थापन केल्या असल्या तरी आता ‘समान नियमावली’ लागू करण्याचे कारणच अस्तित्वात नसते, जर संस्था एकसंध असत्या. “संघटन एक असूनही बजेट हेड वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे लाभ व्यवस्थित पोहचत नाहीत. सरकारचा ‘डिव्हाइड अँड रूल’ फंडा यामागे आहे,” अशी टीका त्यांनी केली.

या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, या आंदोलनाचे केंद्र मुंबईतील मंत्रालयात नेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काल अनेक संशोधक विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून त्यांच्या संशोधनाचे महत्त्व समजून घेतले आहे. “या लढ्यात आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत,” असेही ते बोलले.


       
Tags: mumbaiPrakash AmbedkarpuneSavitribai Phule Pune Universitystudent protestvbaforindia
Previous Post

स्थानिक स्वराज्य निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार ; नागपुरात वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!

Next Post

सरकारने महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – डॉ. भीमराव आंबेडकर

Next Post
सरकारने महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – डॉ. भीमराव  आंबेडकर

सरकारने महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – डॉ. भीमराव आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर
बातमी

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर

by mosami kewat
January 1, 2026
0

वसई-विरार : आगामी १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने...

Read moreDetails
नवी मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 18 उमेदवारांची यादी जाहीर

नवी मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 18 उमेदवारांची यादी जाहीर

January 1, 2026
“भीमा कोरेगावचा इतिहास हा मानवतेचा इतिहास”; ५०० शूरवीरांना अभिवादन करताना बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिपादन

“भीमा कोरेगावचा इतिहास हा मानवतेचा इतिहास”; ५०० शूरवीरांना अभिवादन करताना बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिपादन

January 1, 2026
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ‘वंचित’चे रणशिंग; पॅनल १४ मधून ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ‘वंचित’चे रणशिंग; पॅनल १४ मधून ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल

December 31, 2025
मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 46 उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 46 उमेदवारांची यादी जाहीर

December 31, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home