मुंबई : फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे विचारवंत, कार्यकर्ते, अधिकारी वर्ग हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित १ ऑक्टोबर रोजीचा ‘आम्ही इराण सोबत’ या मोर्च्याबद्दल विचारायला लागलेत. चर्चा करायला लागलेत. चळवळ ही व्यक्ती केंद्रीत मुद्द्यांवर नसून सार्वत्रिक मुद्द्यांवर देखील आहे.
‘आम्ही इराण सोबत’ आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे. आम्ही देश म्हणून इराण बरोबर का ? कारण, इराण आमच्या सोबत आहे म्हणून. अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे मांडली आहे.
ॲड. आंबेडकरांनी ट्विट मध्ये खालील मुद्दे मांडले –
• काश्मीरच्या प्रश्नावर इराणने जागतिक पातळीवर भारताची बाजू घेतली.
• इराण हा भारताला उधार तत्वावर क्रूड ऑईल देणारा देश आहे.
आज अमेरिका-इस्त्रायल इराणला संपवण्याची भाषा करताय. अशा परिस्थितीत देश म्हणून आपण इराण सोबत उभे राहिले पाहिजे. दुर्दैवाने आरएसएस-भाजपचे सरकार हे उघडपणे इस्रायल सोबत आहेत. या युद्धात त्यांनी इस्रायलला शस्त्रास्त्रे पुरवली आहेत. ही घटना वंचित बहुजन आघाडीने बाहेर काढली.
युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढल्या तर सामान्य लोकांचे घरगुती बजेट कोलमडून पडेल. इराणकडून कच्चे तेल स्वस्त आणि वेळेत आले, तर महागाईची झळ सामान्य माणसाला बसणार नाही.
१ ऑक्टोबरचे आंदोलन हे देशातील दोगले सरकारला उघडे पाडण्यासाठी आहे. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत भारतीय जनता इराण सोबत आहे, हे सांगण्यासाठी सर्वांनी १ ऑक्टोबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे जमावे आणि आपले मत नोंदवावे.






