मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी NEET परीक्षा रद्द करण्याची आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्याची जोरदार मागणी केली आहे.
वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार, परीक्षेतील गैरव्यवहार आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, पारदर्शक व राज्यनिहाय गरजांनुसार शिक्षण व्यवस्था उभारावी आणि प्रवेश प्रक्रिया अधिक विश्वासार्ह करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.



