Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎’इंडिया’ आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

mosami kewat by mosami kewat
August 11, 2025
in बातमी
0
'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎'इंडिया' आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎'इंडिया' आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

       

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या कार्यपद्धतीवर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. ‘वरातीमागे घोडं’ अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती असून, ज्यावेळी ईव्हीएमविरोधात लढण्याची खरी गरज होती, त्यावेळी कोणीच पुढे आले नाही, असे ते म्हणाले.
‎
‎आता ओरड करण्याऐवजी योग्य वेळी पावले उचलणे आवश्यक होते, असा टोला त्यांनी लगावला. आंबेडकर यांनी या दोन्ही पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. सामान्य जनतेची दिशाभूल करू नका. जिथे लढायला पाहिजे तिथे तुम्ही लढत नाही, असे ते म्हणाले. पाकिस्तानला पाच तुकड्यांमध्ये विभागण्याची संधी असताना काँग्रेसने युद्ध का थांबवले, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तीच भूमिका काँग्रेस आजही घेत आहे, असे त्यांनी म्हटले.
‎
‎शरद पवार यांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह
‎
‎काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी शरद पवार यांच्यासोबत दोन अज्ञात व्यक्तींची एंट्री झाल्याच्या वृत्तावरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार दोन लोकांना घेऊन राहुल गांधींकडे गेले, त्यांची नोंद राहुल गांधींच्या घरी असणार आहे. शरद पवारांसोबतची ती दोन माणसे कोण होती, त्यांची नावे जाहीर करा.
‎
‎सामान्य माणसाला फसवू नका, असे आवाहन करत त्यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला. ईव्हीएमबाबत आपण २००४ पासून धोक्याची सूचना देत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
‎
‎ईव्हीएम आणि निवडणूक आयोग
‎
‎निवडणूक आयोगावर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, ‘इलेक्शन कमिशन स्वतः मूर्ख आहे.’ निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी आपण पत्र दिले होते, पण त्यावेळी कोणीही सोबत आले नाही. मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असली तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असे त्यांनी सांगितले.
‎
‎’इंडिया’ आघाडीने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करताना, तुमचा लढा खरा असेल आणि तुम्ही पंतप्रधान मोदींना घाबरत नसाल तर तुम्ही यात नक्की सहभागी व्हा, असे त्यांनी आव्हान दिले.
‎
‎’एक नागनाथ, दुसरा साधनाग’
‎
‎शरद पवार यांनी सुरू केलेल्या ‘मंडल’ यात्रेवरही आंबेडकरांनी हल्लाबोल केला. ही यात्रा ओबीसींच्या कल्याणासाठी नसून त्यामागे राजकीय हेतू आहे, असा आरोप त्यांनी केला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींच्या शिष्यवृत्तीला विरोध केला होता.
‎
‎श्रीमंत मराठे हे राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार आहेत आणि त्यांच्या विरोधात ओबीसी जाऊ नये, हाच या यात्रेमागचा उद्देश आहे, असे ते म्हणाले. भाजपकडे झुकलेला ओबीसी आता पुन्हा विचार करत आहे. एक नागनाथ आहे आणि दुसरा साधनाग आहे, अशी उपरोधिक टीका करत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकारणावर निशाणा साधला.


       
Tags: CongressindiaNCPPrakash Ambedkarvbaforindia
Previous Post

‎अकोल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक

Next Post

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

Next Post
मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

by mosami kewat
June 12, 2026
0

मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'विद्यार्थी आक्रोश मोर्चा' दरम्यान मोठा तणाव...

Read moreDetails
' अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ' प्रकाश आंबेडकरांचा सवाल

‘ अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ‘ प्रकाश आंबेडकरांचा सवाल

June 12, 2026
अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि 'युद्ध' नावाचा कॉर्पोरेट धंदा

अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि ‘युद्ध’ नावाचा कॉर्पोरेट धंदा

June 12, 2026
मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

June 12, 2026
बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

June 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home