पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाशआंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका करत २३ मार्च रोजी नागपूर येथे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. सामाजिक माध्यमावर केलेल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, देशभरात अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा लागू करण्याचा निर्णय हा सत्ताधाऱ्यांच्या राजकारणाचा परिणाम आहे.
इराणसोबत भारताने मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले असते, तर ज्या प्रकारे इराण चीनला तेल पुरवत आहे त्याचप्रमाणे भारतालाही वायू मिळू शकला असता, असे त्यांनी नमूद केले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताची विविध स्तरांवर नाकेबंदी होत असून पुढचा मोठा फटका बँकिंग व्यवस्थेला बसू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. (Prakash ambedkar)
सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेला मोठे दुःख सहन करावे लागत असल्याचा आरोप करत अॅड. आंबेडकर यांनी २३ मार्च रोजी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि साम्यवादी पक्ष सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Prakash ambedkar)
या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.





