औरंगाबाद : सामाजिक, शैक्षणिक आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या “प्रबुद्ध भारत” मीडिया हाऊसच्या औरंगाबाद कार्यालयाचे उद्घाटन आज ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा नगरसेवक अमित भुईगळ, प्राचार्य डॉ. संजय मुन, प्रा. भारत शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे, नगरसेविका करूणा जाधव, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतिश गायकवाड, वंचितचे शहराध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, ईश्वर भातपुडे, मुख्याध्यापक शंकर मेश्राम, रतनकुमार साळवे, देवराज वीर, राजेश मेश्राम, मेघानंद जाधव, धम्माप्रचारक आसाराम गायकवाड, डॉ. रेखा मेश्राम, बेबीनंदा पवार, मंगल मून, डॉ. धनराज गोंडाने, राजेश शेगावकर, गजानन लांडगे, सूरज मेश्राम, बाबुराव गवई, मोहित मेश्राम तसेच प्रबुद्ध भारतचे भारत शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी “प्रबुद्ध भारत” मीडिया हाऊसच्या कार्याला शुभेच्छा देत, समाजातील वंचित, उपेक्षित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले. सत्य, वस्तुनिष्ठ आणि लोकाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे घडावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




