मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जाहीर केलेल्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गांसाठी राखीव जागा नसल्याने मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या संदर्भात, सामाजिक संघटना आणि इच्छुक उमेदवारांनी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देऊन भरती प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत आरक्षित गटांसाठी कोणत्याही जागा ठेवण्यात आलेल्या नाहीत. याशिवाय, अर्ज शुल्क म्हणून १,१०० रुपये आणि नियुक्तीनंतर १० लाखांचा बॉन्ड अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत, ज्याला उमेदवारांकडून तीव्र विरोध होत आहे.
निवेदनात सहकार मंत्र्यांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी या भरती प्रक्रियेत तातडीने हस्तक्षेप करून सध्याची जाहिरात मागे घ्यावी आणि रद्द करावी. तसेच, नवीन जाहिरात काढून त्यामध्ये SC, ST, OBC या आरक्षित समूहातील वर्गांसाठी राखीव जागा ठेवण्यात याव्यात. यासोबतच, अर्ज शुल्कापोटी घेण्यात येणारी मोठी रक्कम आणि १० लाखांचा बॉन्ड या अटींमध्येही कपात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गोवंडीत वंचित बहुजन आघाडीचा ‘जन आक्रोश मोर्चा! मागण्या तत्काळ मान्य न केल्यास प्रशासनाला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
मुंबई : गोवंडी परिसरात नागरिकांच्या विविध समस्या आणि एम वॉर्डमधील प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेशच्या...
Read moreDetails






