Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ईव्हीएम बिघाड, गोंधळ अन् राडा! राज्यभर महापालिका निवडणुकीत मतदारांना मनस्ताप

mosami kewat by mosami kewat
January 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ईव्हीएम बिघाड, गोंधळ अन् राडा! राज्यभर महापालिका निवडणुकीत मतदारांना मनस्ताप
       

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात राडा पाहायला मिळाला. या निवडणुकीत शाई पुसण्यापासून ते ईव्हीएम बंद पडणे, पैशांची पाकिटे वाटणे आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारी अशा अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

मालेगावातून एक धक्कादायक बाब समोर आली. एकाच ठिकाणी ८०० हून अधिक मतदान कार्ड सापडली. हे मतदान कार्ड बोगस असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

पिंपरीत मतदान केंद्रावर राडा

पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव नाही. मतदार याद्या व्यवस्थित नाहीत, उमेदवाराला न विचारता EVM मशीन वरील स्टिकर निवडणूक विभागाने काढून टाकले, बदलले, असे आरोप करण्यात आले. निवडणूक आयोगाकडे याची तक्रारही केली होती. मात्र तक्रारीची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे थेट मतदान केंद्रावरच महिलेने राडा घालत निवडणूक आयोगाची गाडी रोखली.

ओळखपत्र नसल्याने मतदार माघारी

जळगाव शहरातील आर. आर. विद्यालय मतदान केंद्रावर सकाळपासूनच वातावरण तापले होते. काही संशयास्पद व्यक्ती बोगस मतदान करण्यासाठी येत असल्याचा दावा करण्यात आले. तक्रारीची दखल घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी संशयित मतदारांची कसून तपासणी केली. तब्बल ४० ते ४५ मतदारांकडे वैध ओळखपत्रे नसल्याचे समोर आले, त्यामुळे त्यांना मतदान न करताच केंद्रावरून परत पाठवण्यात आले.

कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

अकोला महापालिकेच्या प्रभाग १७ मधील भांडपुरा चौक परिसरात असलेल्या उर्दू कन्या शाळेत मतदानादरम्यान मोठा राडा झाला.
सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, मात्र किरकोळ कारणावरून दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, ज्यामुळे मतदान केंद्रावर एकच पळापळ सुरू झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि बळाचा वापर करून जमावाला पांगवण्यात आले. 

या गोंधळामुळे निवडणूक आयोगावर चहूबाजूंनी टीका होत आहे. ही निवडणूक केवळ बोटाला लावलेली शाई पुसण्याची नसून, लोकशाही पुसून टाकण्याचा एक डाव आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे दिसले.


       
Tags: AkolaElectionElection commissionjalgaonMaharashtraMaharashtra election newsMunicipal corporation electionpoliticspuneVanchit Bahujan AaghadivbaforindiaVoting
Previous Post

पुण्यात ‘शाही’चा खेळ की बोगसगिरीचा मेळ? मार्कर पेनच्या पुसट खुणांनी निवडणूक प्रक्रियेचे वाभाडे!

Next Post

वंचित बहुजन आघाडी सत्तेच्या पटावर निर्णायक !

Next Post
वंचित बहुजन आघाडी सत्तेच्या पटावर निर्णायक !

वंचित बहुजन आघाडी सत्तेच्या पटावर निर्णायक !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार
बातमी

नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार

by mosami kewat
August 11, 2026
0

प्रस्ताव जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप; गटनेते इंजि. प्रशांत इंगोले यांचा सभागृहाच्या पायरीवर ठिय्या नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंचित...

Read moreDetails
लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

August 11, 2026
युपीआयवर शुल्क लागू होणार? अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांचा डोळा आणि ‘डेटा’चे राजकारण

युपीआयवर शुल्क लागू होणार? अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांचा डोळा आणि ‘डेटा’चे राजकारण

August 11, 2026
धानोरा जहागीर व शिंदगीतील लाभार्थ्यांची मागणी; राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला निवेदन

धानोरा जहागीर व शिंदगीतील लाभार्थ्यांची मागणी; राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला निवेदन

August 11, 2026
जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करा; राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळांचे १५ दिवसांत सामाजिक सर्वेक्षण करा – राजेंद्र पातोडे

जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करा; राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळांचे १५ दिवसांत सामाजिक सर्वेक्षण करा – राजेंद्र पातोडे

August 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home