कळमनुरी (जि. हिंगोली) : वंचित बहुजन युवक आघाडी, कळमनुरीच्या वतीने मंडल आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयाच्या स्मरणार्थ ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या आदेशानुसार आयोजित या कार्यक्रमात ओबीसी समाजाच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली.
शासकीय विश्रामगृह, कळमनुरी येथे झालेल्या कार्यक्रमात ओबीसी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, पत्रकार व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मंडल आयोग, सामाजिक न्याय आणि आजच्या काळातील ओबीसी चळवळीचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन युवा आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे होते. तर युवा नेते राजू कांबळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ ओबीसी नेते खंडबराव नाईक, चंपतराव नाईक, लक्ष्मीकांत कस्तुरे, सुभाष कोकरे, सोनबाराव कोकरे, बापुराव महाजन, शिवाजी भूतनर, डॉ. अजय राठोड आणि साबेर अत्तार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे सामाजिक न्यायाच्या चळवळीला मिळालेली दिशा तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याची गरज अधोरेखित केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण नरवाडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन युवा तालुकाध्यक्ष मोहम्मद असलम, युवा तालुका महासचिव दिनेश पाईकराव, युवा तालुका उपाध्यक्ष राष्ट्रपाल कोकरे आणि युवा तालुका सचिव जयभीम डोंगरे यांनी केले.
यावेळी माथाडी तालुकाध्यक्ष जितेश कदम, गौतम दांडेकर, शंकर रणवीर, काशिनाथ मोगले, विनोद ढेपे, भगवान ढेपे, दादाराव खंदारे, धम्मपाल पाईकराव, गोविंद राऊत, सचिन हटकर, शीलवान नरवाडे, नथुराम खंदारे, सुशांत पाईकराव, गोविंद गवळी, नितीन घोडगे, आकाश मोगले, बबन खंदारे, शेख मोबिन, सलीम पठाण, प्रवीण पाईकराव, शेख अक्रम, शेख मुजीब, राजू दांडेकर, आनंदा मोगले, प्रकाश पाईकराव, अंबादास खिल्लारे, रामा दासुदकर, गौतम पतीगराव, गजानन पाईकराव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ओबीसी चळवळीशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.






