विरार : वंचित बहुजन आघाडी वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ४९ व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रात्री आठ वाजता विरार (पूर्व) येथील मनवेलपाडा, कारगील नगर स्थित वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडला.
कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आणि सामाजिक योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे विरार शहर अध्यक्ष सुनील बेडे गुरुजी, सेक्रेटरी बाळा मोहिते गुरुजी, वंचित बहुजन आघाडी वसई-विरार शहर सल्लागार दिलीप साळुंके, महासचिव मिलिंद कांबळे आणि उपाध्यक्ष सुविध पवार यांनी आपले विचार मांडले.
या प्रसंगी विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभा विरार शहर खजिनदार सागर मोरे, संस्कार विभाग उपाध्यक्ष जितेंद्र तांबे, शिवसेना उपशहरप्रमुख प्रविण जाधव, आंतरराष्ट्रीय भिम सेनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश चव्हाण, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७०६ चे निलेश गायकवाड, तसेच वंचित बहुजन आघाडी वसई-विरार शहर सचिव दिपक जाधव, विरार शहर उपाध्यक्ष सनी कांबळे, उपाध्यक्ष निखिल तांबे, ज्येष्ठ सदस्य विश्वनाथ जाधव आणि बबन कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात हा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला.






