Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
August 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा
       

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आदिवासी अनुदानित आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या मागणीसाठी वंचितचे नागपूर जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांनी आदिवासी विकास विभाग, नागपूरचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले.

दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री जपतलाई येथील आदिवासी अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त होत असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्य व सुरक्षेची जबाबदारी शासनाची असताना आश्रमशाळेतील कथित निष्काळजीपणामुळे अशी घटना घडणे गंभीर व निंदनीय असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून चौकशी करावी आणि चौकशीचा अहवाल १५ दिवसांत सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या शालेय अधिकारी, कर्मचारी, वसतिगृह अधीक्षक आणि संस्था संचालक यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

मृत्यू झालेल्या प्रत्येक विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना तात्काळ ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका वारसाला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी वंचितने केली आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांची तातडीने तपासणी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि निवासाच्या सुविधा युद्धपातळीवर उपलब्ध करून द्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासनाने १५ दिवसांच्या आत या मागण्यांवर ठोस कार्यवाही केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अजय सहारे यांनी दिला. यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यालयीन सचिव वैभव येवले, आय.टी. सेल प्रमुख शुभम वाहने आणि अनिल नांदूरकर उपस्थित होते.


       
Tags: GadchiroliJaptlai Ashram SchoolMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

by mosami kewat
August 15, 2026
0

मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

August 15, 2026
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

August 14, 2026
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 14, 2026
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home