जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद गावात सुलेमान खान या मुस्लिम युवकाची मॉब लिंचिंग करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येच्या निषेधार्थ व दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी (VBA) व एकता फाउंडेशनच्यावतीने यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभाताई पाटील, एकता फाउंडेशन अध्यक्ष कुर्बान शेख करीम, अन्वर भाई खाटीक (फैजपूर), वंचित बहुजन आघाडी यावल तालुकाध्यक्ष भगवानभाऊ मेघे, समाजसेवक शेख अलीम, आरिफ भाई, शफी भाई, कबीर खान, मजर खान तसेच शहर व परिसरातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनाद्वारे सरकारने या अमानुष हत्येचा निषेध करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
हैदराबाद विमानतळावर बॉम्बच्या धमक्या! तीन आंतरराष्ट्रीय विमाने ‘हाय अलर्ट’वर; सुरक्षा यंत्रणांची कसून तपासणी
हैदराबाद : इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo Airlines) फ्लाइट रद्द होण्याच्या संकटातून प्रवासी अद्याप सावरले नसतानाच, आता एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक...
Read moreDetails






