Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्यात पुढील ५ दिवस ‘धुवॉंधार’ पाऊस! २१ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

mosami kewat by mosami kewat
September 25, 2025
in बातमी
0
राज्यात पुढील ५ दिवस ‘धुवॉंधार’ पाऊस! २१ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
       

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घातलेले थैमान आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झालेले असतानाच, हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीचा (Heavy to Very Heavy Rainfall) गंभीर इशारा दिला आहे.

आज ८ जिल्ह्यांना ‘अतिवृष्टी’चा धोकाआज, गुरुवारपासूनच राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

कोकण : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे.

पश्चिम महाराष्ट्र : पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या संवेदनशील भागांवर ‘अतिमुसळधार’ पावसाचे सावट आहे.

विदर्भ : यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

या भागात विजांच्या कडकडाटासह वादळे आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट

हवामान विभागाने आज यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

याव्यतिरिक्त, कोकण (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग), मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र (पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर), मराठवाडा (परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव) आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांसह एकूण २० जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

शनिवार आणि रविवार अधिक गंभीरराज्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतचा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

शुक्रवार (उद्या): मुंबईसह १८ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा आहे. रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाटमाथ्याला ‘ऑरेंज अलर्ट’ तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव वगळता संपूर्ण महाराष्ट्राला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

शनिवार (27 सप्टेंबर): हा दिवस अधिक गंभीर असणार आहे. २१ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा असून, मुंबई, ठाणे, संपूर्ण कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यातील लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

रविवार (28 सप्टेंबर): या दिवशीही परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता आहे. २२ जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा असून, कोकण आणि घाटमाथा पुन्हा ‘ऑरेंज अलर्ट’ मध्ये आहेत.

शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.


       
Tags: FarmerkokanKolhapurMaharashtraMonsoonmumbainagpurpunerainRainfallSataravidarbha
Previous Post

सायबर हल्ल्यामुळे जग्वार लँड रोव्हर संकटात: टाटा मोटर्सला $2 अब्ज पौंडचा जबरदस्त फटका! उत्पादन ठप्प, शेअर कोसळले

Next Post

लेह-लडाखमध्ये आंदोलनाचा भडका! तरुणाई आक्रमक, पोलीस वाहने आणि भाजप कार्यालय पेटवले

Next Post
लेह-लडाखमध्ये आंदोलनाचा भडका! तरुणाई आक्रमक, पोलीस वाहने आणि भाजप कार्यालय पेटवले

लेह-लडाखमध्ये आंदोलनाचा भडका! तरुणाई आक्रमक, पोलीस वाहने आणि भाजप कार्यालय पेटवले

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते
बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

by mosami kewat
May 9, 2026
0

मुंबई: प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस प्रकाशित आणि फारुख अहमद लिखित मुसलमानों का सियासी अजेंडा या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन वंचित बहुजन...

Read moreDetails
ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

May 8, 2026
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

May 7, 2026
तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

May 7, 2026
अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

May 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home