Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

भाजप देश मोठा मानते का अहंकार?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 2, 2024
in राजकीय
0
भाजप देश मोठा मानते का अहंकार?
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल : साताऱ्यात प्रचार सभा

सातारा : देश मोठा की अहंकार मोठा ? माझ्या दृष्टीने देश हा मोठा असतो आणि आपला अहंकार लहान असतो. आपण पाहत असाल की, आपले पंतप्रधान आपला अहंकार आधी ठेवतात आणि देशाला पाठीमागे ठेवतात अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. सातारा लोकसभेचे उमेदवार माजी सैनिक प्रशांत कदम यांच्या प्रचार सभेत आंबेडकर बोलत होते.

आगामी काळात धोके मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. अशा परिस्थितीत अधिकारी आणि सैनिक यांच्यात जिव्हाळ्याचे नाते असले पाहिजे. या नात्याला आता तडा जात आहे, असे मला अनेकजण सांगतात. आपण मतदानाच्या माध्यमातून शांतीपूर्ण बदल करावा असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, सध्याचे सरकार हे जुमलेबाज सरकार आहे. पहिल्यांदा 15 लाखाचा जुमला केला. नंतर सांगितले 2 कोटी रोजगार देऊ. पण दरवर्षी 12 लाख नोकऱ्या कमी होत आहेत, तिथेही या सरकारचे अपयश आहे. ज्या पंतप्रधानाला माणसांबद्दल जिव्हाळा नाही, त्याला पंतप्रधान करणे हा आपला गुन्हा आहे हे लक्षात घ्या. 10 वर्षे भाजपची सत्ता आहे, या दहा वर्षांत भाजपने धर्माच्या नावाने द्वेष पेरला आहे. समाजात फूट पाडण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे.

जे काम आर्मीने ईशान्य भारतात केले आहे. तेथील लोकांना आपल्यासोबत राहायचं नाही अशी भावना तिथे होती. 20 ते 30 वर्षे आर्मी तिथे राहिली, त्यांनी तिथे संबंध जोडले. त्यांची भावना पूर्णपणे बदलली. आज ते म्हणत आहेत की, आम्हाला भारतासोबत राहायचं आहे. त्यांना जोडण्याचं काम आर्मीने केले. मणिपूरच्या घटनेमुळे जुळलेली मने दुभंगली असल्याची खंत देखील त्यांनी या वेळी बोलून दाखवली.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बोलत असताना आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने मराठा आणि ओबीसींमध्ये मध्यस्थी केली नसती, सामंजस्याची भूमिका घेतली नसती, तर युद्धासारखी परिस्थिती होती. त्यावेळी इथले राजकीय नेतृत्व कोणत्या बिळात बसले होते कोणाला माहिती ?

भाजपसोबत त्यांनी काँग्रेसचाही समाचार घेतला. भाजपचे राजकारण द्वेषावर आधारित आहे. 10 वर्षांच्या कालावधीत त्यांनी एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. हळूहळू काँग्रेससुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. मुस्लिम समाज आणि जैन समाज यांना उमेदवारी द्यायची नाही ही भाजपची भूमिकाच आता काँग्रेस घेत असल्याची टीका आंबेडकर यांनी काँग्रेसवर केली.

आम्ही वंचितांचे राजकारण करत आहोत. उपेक्षितांचे राजकारण करत आहोत. समाजाने बहिष्कृत केलेल्यांचे राजकारण करत आहोत. मुंबईसारख्या शहरात मोदीना उत्तर देण्यासाठी ६ पैकी 3 मुस्लीम उमेदवार दिले असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. त्याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की,  समाजातील सामंजस्य राहिले पाहिजे.

बँकेतील खातेदाराचे 12 लाख कोटी डूबले आहेत. हे डूबायला लावणारे गुजराती लोक आहेत. तरीही एकातरी गुजराती माणसावर धाड पडली आहे का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दिल्ली राजधानी असताना आंतरराष्ट्रीय कार्यक्रम इथे झाले नाहीत यावर त्यांनी उपस्थितांना प्रश्न विचारले. ते म्हणाले की, दिल्ली ही राजधानी आहे. पण 10 वर्षांत दिल्लीमध्ये किती आंतरराष्ट्रीय कार्यक्रम झाले ? गांधीनगरमध्ये किती झाले ? अहमदाबादमध्ये किती झाले ? दिल्ली मध्ये आंतरराष्ट्रीय कार्यक्रम झाले नसून गुजरात मध्येच मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाले याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधानाचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असले पाहिजे. आता ते वसुलीचे कार्यालय झाले आहे असा टोलाही त्यांनी लगावला.


       
Tags: Loksabhaparlimentry electionParlmentry Election 2024Prakash AmbedkarSataraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

लोकशाही

Next Post

..तेव्हा वंचित तुमच्या सोबत उभी होती!

Next Post
..तेव्हा वंचित तुमच्या सोबत उभी होती!

..तेव्हा वंचित तुमच्या सोबत उभी होती!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष
बातमी

वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष

by mosami kewat
January 18, 2026
0

नागपूर : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद नागपूर जिल्ह्यात उमटत आहेत. सध्या जल्लोषाचे वातावरण...

Read moreDetails
चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे – प्रा. डॉ. किशोर वाघ

चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे – प्रा. डॉ. किशोर वाघ

January 18, 2026
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

January 17, 2026
काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत वंचितला फटका; सिद्धार्थ मोकळे

काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत वंचितला फटका; सिद्धार्थ मोकळे

January 17, 2026
प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘गुलाल’ उधळला! पॅनेलचा दणदणीत विजय

प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘गुलाल’ उधळला! पॅनेलचा दणदणीत विजय

January 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home