Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 11, 2025
in बातमी
0
धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
       

सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल !

परभणी : सोमनाथच्या मारेकर्‍यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? असे विचारत जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का? असा संतप्त सवाल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयबाई व भाऊ अविनाश सुर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे.

ज्यांनी सोमनाथचा खून केला त्या पोलिसांना सरकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असून त्यांना आ.धस यांची साथ असल्याचा आरोपही सोमवारी (दि.10) पत्रकार परिषदेत करण्यात आला. शहरात वंचित बुहजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश भोसीकर, महिला जिल्हाध्यक्षा सुनिता साळवे यांची उपस्थिती होती.

नाशिक येथे लाँग मार्च आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या आमदार सुरेश धस यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते पोलिसांना माफ करण्यासंदर्भात वक्तव्य करत आहेत. याबाबत जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का? असा संतप्त सवाल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने उपस्थित केला आहे.

तसेच जोपर्यंत सर्व दोषी पोलीस अधिकार्‍यांना शिक्षा होऊन आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.आ.धस यांनी मन मोठं करा आणि पोलिसांना माफ करा असे म्हटले असून त्याचा समाचार घेत विजयाबाई सुर्यवंशी म्हणाल्या की, आमचं मन छोटंच आहे, आम्ही गुन्हेगारांना अजिबात माफ करणार नाही. तुमचं चुकीचं बोलणं सहन करणार नाही. माझ्या पोटचं लेकरू गेलंं आहे. माझं लेकरू परत आणून देऊ शकता का? मी कोण्या पोलिसाला माफ करणार नाही, त्यांना मोकळं सोडणार नाही.पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या सर्वांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि सोमनाथचे मारेकरी पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोदवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील सुर्यवंशी कुटुंबियांनी यावेळी केली.

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यामुळेच सत्य घटना बाहेर आल्या असून तेच आम्हाला न्याय मिळवून देतील असा विश्वास विजयाबाई सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा संवैधानिक मार्गाने सुरूच राहील असे अविनाश सुर्यवंशी यांनी सांगितले.


       
Tags: parbhaniPrakash AmbedkarSomnath SuryawanshiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

भटके विमुक्तांच्या मुलांसाठी सक्तीचे शिक्षण योजना राबविणे गरजेचे : डॉ. नारायण भोसले

Next Post

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

Next Post
तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा - रोहिदासीया धर्म

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा
बातमी

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

by mosami kewat
July 22, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री...

Read moreDetails
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

July 22, 2026
दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

July 22, 2026
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

July 22, 2026
२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

July 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home