Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

mosami kewat by mosami kewat
April 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
       

अहमदनगर : घारगाव येथे विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळावर झालेल्या भ्याड हल्ल्याने राज्यातील लोककलावंतांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या तमाशा कलेला जिवंत ठेवणाऱ्या कलावंतांवरच अशा प्रकारचे हल्ले होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तमाशा फडाचे वाहन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबले असताना काही समाजकंटकांनी गाडी आडवी लावून अडवली. यानंतर फडातील महिला कलाकारांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत ड्रायव्हरने शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला उत्तर म्हणून हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे तमाशा फडातील कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Ahmedabad News)

ही घटना केवळ एकाकी नसून, राज्यभरात यात्रा आणि जत्रांच्या काळात तमाशा फडांना अशा प्रकारच्या त्रासाला वारंवार सामोरे जावे लागत असल्याचे समोर येत आहे. दुसऱ्या गावात जाऊन आपल्या कलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या या कलावंतांना स्थानिक पातळीवरील काही गावगुंडांकडून अपमानास्पद वागणूक आणि असुरक्षितता सहन करावी लागते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. (Ahmedabad News)

तमाशा ही केवळ मनोरंजनाची कला नसून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आत्मा आहे. मात्र, या कलेमागे उभे असलेले कलाकार आजही उपेक्षित आणि असुरक्षित जीवन जगत आहेत, ही कटू वस्तुस्थिती आहे. ज्या कलाकारांच्या कलेवर समाज टाळ्यांचा वर्षाव करतो, त्यांच्याच सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावातील ग्रामस्थ, यात्रा समित्या आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन तमाशा फडांना ठोस सुरक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करून अशा समाजकंटकांना वचक बसवावा, अशी मागणी लोककलावंत समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांच्यासह विविध स्तरांतून केली जात आहे. (Ahmedabad News)

“कलावंत सुरक्षित असेल, तरच कला टिकेल आणि कला टिकली, तरच संस्कृती जिवंत राहील,” असा ठाम संदेश देत या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.


       
Tags: ahmadnagarMaharashtraPolitical
Previous Post

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

Next Post

Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

Next Post
Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 
बातमी

गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 

by mosami kewat
August 22, 2026
0

जनतेने लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहन औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता...

Read moreDetails
राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

August 22, 2026
मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

August 22, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

August 22, 2026
अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

August 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home