Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रमाई आवास योजनेतील ₹३.०७ कोटींचा निधी अडवला; वंचित बहुजन आघाडीने केली चौकशीची मागणी

mosami kewat by mosami kewat
August 3, 2025
in बातमी
0
रमाई आवास योजनेतील ₹३.०७ कोटींचा निधी अडवला; वंचित बहुजन आघाडीने केली चौकशीची मागणी

रमाई आवास योजनेतील ₹३.०७ कोटींचा निधी अडवला; वंचित बहुजन आघाडीने केली चौकशीची मागणी

       

बीड : अंबाजोगाई नगर परिषद रमाई आवास घरकुल योजनेच्या निधीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. सुमारे ३ कोटी ७ लाख ५० हजार रुपयांचा निधी अडवून बेकायदेशीरपणे त्याचा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नितीन सरवदे यांनी समाज कल्याण आयुक्त बीड यांच्याकडे केली आहे. तसेच, २००६ ते २०२२ या कालावधीत अंबाजोगाई नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आलेला ७६ कोटी रुपयांचा रमाई आवासचा निधी लाभार्थ्यांना न देता हडप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
‎
‎निधी वाटपात दिरंगाई आणि गैरव्यवहाराचा आरोप

‎जिल्हा नगर प्रशासन विभाग, बीड यांनी २३ एप्रिल २०२५ रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया, मोंढा रोड, बीड येथील बँकेला अंबाजोगाई नगर परिषदेच्या खात्यात ३ कोटी ७ लाख ५० हजार रुपये जमा करण्याचे पत्र दिले होते. मात्र, बँक आणि बेकायदेशीरपणे डी.पी.ओ. कार्यालयाचे काम पाहणारे अधिकारी रामकिशन सदगर यांच्याकडून निधी वाटपात हेतुपुरस्सर दिरंगाई केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
‎
‎या दिरंगाईमुळे अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांमध्ये निराशा निर्माण करण्याचा आणि योजनेची प्रक्रिया थांबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा नगर प्रशासन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित बँक व्यवस्थापक यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सरवदे यांनी केली आहे.
‎
‎याचबरोबर, २००६ ते २०२२ या काळात अंबाजोगाई नगर परिषदेला रमाई आवास घरकुल योजनेसाठी ७६ कोटी रुपये मिळाले होते. तत्कालीन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर करूनही हा निधी वितरीत केला नाही, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
‎
‎या निधीचा गैरवापर करत तो गायब करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या निधीचा वापर कसा झाला याबाबत जिल्हा नगर प्रशासन विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाकडे माहिती उपलब्ध नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची उच्च स्तरावर चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‎
‎कारवाई न झाल्यास ५ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा

‎या मागण्यांची दखल न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे ५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर संवैधानिक मार्गाने ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही नितीन सरवदे आणि धम्मपाल मोरे यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.


       
Tags: Corruption allegationsprotestRamai Awas Gharkul Yojanaबीड
Previous Post

SSC परीक्षांमधील गोंधळ: वंचित बहुजन आघाडीचा विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आंदोलनाचा इशारा

Next Post

वंचित बहुजन आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू; जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांची नागपूरमध्ये बैठक

Next Post
वंचित बहुजन आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू; जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांची नागपूरमध्ये बैठक

वंचित बहुजन आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू; जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांची नागपूरमध्ये बैठक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त

by mosami kewat
April 19, 2026
0

जालना : सेवली सर्कल अंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेतील घरकुलांचे रखडलेले हप्ते आणि अपूर्ण कामांचा प्रश्न...

Read moreDetails
शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 19, 2026
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 19, 2026
‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

April 19, 2026
कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?

कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?

April 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home