Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!

mosami kewat by mosami kewat
July 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!
       

अहिल्यानगर: NEET परीक्षा प्रणालीतील महाघोटाळा आणि NTA च्या बेजबाबदार कारभारामुळे देशभरात तब्बल २२ निष्पाप विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं, तरीही या देशातील आणि राज्यातील राजकारण्यांना पाझर फुटलेला नाही. हिंदू-मुस्लिम किंवा धार्मिक मुद्द्यांवर हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरणारे नेते विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा बळी जात असताना तोंडावर बोट ठेवून बसले आहेत, ही या देशाची मोठी शोकांतिका आहे.

या राजकीय अनास्थेविरोधात काल अहिल्यानगरात ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने भव्य ‘संघर्ष मार्च’ काढून केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला. माळीवाडा वेस येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या संघर्षाची धगधगती सुरुवात झाली. कापड बाजार मार्गे निघालेला हा शिस्तबद्ध मार्च दिल्ली गेट येथे पोहचल्यानंतर तेथे भव्य ठिय्या आंदोलनात रूपांतरित झाला. हातात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचे फलक, NTA च्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करणारे बॅनर्स आणि लडाखचे शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनाचे पोस्टर्स घेऊन शेकडो विद्यार्थी आणि नागरिक केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरले होते.

Also Read : आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

या आंदोलनाला पूर्ण ताकदीने पाठिंबा देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी राजकीय व्यवस्थेवर कडक ताशेरे ओढले. ते म्हणाले की, धार्मिक वादांवर द्वेषाची पोळी भाजण्यासाठी हजारोच्या संख्येने एकत्र येणाऱ्या नेत्यांना विद्यार्थ्यांच्या रक्ताचा वास येत नाही का? २२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनेही या निगरगट्ट व्यवस्थेला फरक पडत नाही. या राजकीय अनास्थेचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. समाजाने आणि राजकीय पक्षांनी आता तरी जागे व्हावे; धार्मिक वादांऐवजी शिक्षण, रोजगार आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या मुद्द्यांवर एकत्र येण्याची वेळ आली आहे.

 यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारसमोर अत्यंत आक्रमक मागण्या मांडल्या. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या महाघोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA कडून परीक्षांचे अधिकार काढून घेऊन अत्यंत पारदर्शक व स्वतंत्र सक्षम यंत्रणा उभी करावी, आणि परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्ट कारभारामुळे बळी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची तात्काळ आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशा रोखठोक मागण्या या वेळी करण्यात आल्या.

SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

या पेटून उठलेल्या संघर्षात सम्यक विद्यार्थी आंदोलनासह दिशा विद्यार्थी संघटना, नौजवान भारत सभा, राष्ट्रीय सेवा दल, संभाजी ब्रिगेड, कामगार संघटना आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी ॲड. श्याम आसावा, जीवन कांबळे, सुशील साळवे, अविनाश धनवे, बापू चंदनशिवे, बहिरनाथ वाकळे, संध्याताई मेढे, अविनाश साठे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अजित कुऱ्हाडे, संकेत शिंदे, रियाज शेख आणि विवेक कसबे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हातात डफली आणि माईक घेऊन सरकारचे वाभाडे काढले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या केंद्र सरकारविरोधात हा संविधानिक लढा यापुढे अधिक तीव्र केला जाईल, असा स्पष्ट इशारा या वेळी आंदोलकांनी दिला.


       
Tags: ahilyanagarAhilyanagar NEET Scam ProtestMaharashtraNEET UG 2026Political
Previous Post

आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

Next Post

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

Next Post
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा
बातमी

स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा

by mosami kewat
August 10, 2026
0

मनमाड : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रशासकीय काळात बसविण्यात आलेले रबरी व फायबरचे स्पीड ब्रेकर अवघ्या काही...

Read moreDetails
मांडेगाव येथे 'जय भीम बुद्ध विहारा'चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

मांडेगाव येथे ‘जय भीम बुद्ध विहारा’चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

August 10, 2026
ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

August 10, 2026
ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

August 10, 2026
मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

August 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home