मुंबई – हाताने गटार साफ करणे, हाताने मलमूत्र उचलणे, साफ करणे आणि वाहून नेणे ही पद्धत बंद झाली आहे. ही प्रथा अमानवी असल्याचे अनेकवेळा सांगितले गेले आहे. तरीही दिल्ली शहरात राजरोस आजही हाताने गटार साफ केले जात असून, हाताने मैला साफ केला जात असल्याचे वास्तव मांडणारे काही फोटो आणि त्याबाबतचा मजकूर दिल्ली सरकारच्या सामाजिक बांधकाम विभागाने सोशल मीडिया एक्स हॅडलवर शेअर केले आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला असून, त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय मंत्रालयाला लाज वाटली पाहिजे, असे म्हणत दिल्ली सरकारला जोरदार फटकारले आहे.
प्रकाश आंबेडकर यांंनी सोशल मीडिया एक्सवर लिहताना म्हटले आहे की, आपल्याकडे चंद्रावर पोहोचून परत येण्याचे तंत्रज्ञान आहे, पण आपला समाज आजही जातीने ग्रस्त असून समाज गटार साफ करण्यासाठी यंत्रे वापरण्यास असमर्थ आहे. तसेच हाताने मलमूत्र उचलणे, साफ करणे आणि वाहून नेणे या पद्धतींवर बंदी आहे. परंतु ही अमानवी प्रथा अजूनही प्रचलित आहे. कारण “जात असते आणि ती जात नाही. तसेच ही अमानवी प्रथा थांबवण्यासाठी किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती अजिबात दिसत नाही असे त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय विभागाला उद्देशून म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून दिल्ली येथील मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दु:ख मांडले आहे. त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय विभागाला लाज वाटली पाहिजे असेही म्हटले आहे. तसेच आपल्या देशातील जात वास्तव यानिमित्ताने अधोरेखीत होत असून आपल्याकडील जात वास्तव जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ही अमानवी प्रथा बंद करण्याची व या कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राजकारणी लोकांची इच्छाशक्ती अजिबात नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच या राजकीय लोकांना याबाबत लाज वाटली पाहिजे असेही सुनावले आहे.