Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

भाजपच्या पायाखालची वाळू सरकली – ॲड.प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 12, 2024
in Uncategorized
0
भाजपच्या पायाखालची वाळू सरकली – ॲड.प्रकाश आंबेडकर
0
SHARES
171
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

जनतेला घाबरवण्याचा प्रयत्न : ॲड.प्रकाश आंबेडकर

पुणे : काल देशभरात साडेचारशे ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. त्या धाडी राजकीय नव्हत्या, तर अराजकीय होत्या. या धाडी टाकण्याचे कारण म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते कितीही म्हणत असतील की, आम्ही चारशे प्लस जागा जिंकणार आहोत, तर ते भीतीपोटी आहे. भीती निर्माण व्हावी म्हणून ते राजकीय आणि अराजकीय (व्यापारी) यांच्यावर देखील धाडी टाकत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.

भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदवण्यासाठी आले असताना त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. भाजप ही भयग्रस्त झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार करून लोकांनाही भयग्रस्त करून आपल्याला जिंकता येतंय का? अशी त्यांची खेळी आहे. म्हणून राजकीय नेते, व्यापारी यांच्यावर धाडी सुरू झाल्या आहेत. आम्ही सर्वसामान्य लोकांना असे विचारतो की, तुम्हाला हे अपेक्षित आहे का? भीती निर्माण करण्यासाठी धाडी हे यंत्र भाजप वापरत असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. महाराष्ट्र कधीही इतका वादग्रस्त नव्हता. या ठिकाणी स्टेबल सरकार चालत होतं. सध्या पक्ष फोडणं, गोळीबार करणं, धमकावणं हे फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे मराठी माणसाच्या मानसीकतेला झेपणारं नाही. तो त्याच्याशी सहमत नाही. त्यामुळे तो इलेक्शनची वाट पाहत आहे, असेही ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सोपवला यावर प्रतिक्रिया देताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, आमच्या पक्षात मंत्री होते, आमदार होते ते निघून गेले. पण, पक्ष म्हणून काही परिणाम झाला नाही. एखाद्याचे पक्ष सोडून जाणे हे धक्कादायक असते. मात्र, त्याने पक्षावर काही परिणाम होतो असे मला वाटत नाही. नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे नेते चौकशी खाली आहेत, त्यांना ते नाचवणार आहेत. उच्च नेते किंवा त्याखालील नेते यांनाही ते नाचवणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

भीमा कोरेगाव दंगल पोलिसांनी घडवली –

भीमा कोरेगाव दंगल पोलिसांनी घडवली आहे. आयोगासमोर हा विषय वळवण्याचा प्रयत्न होत होता आणि ते माझ्या तोंडून वदवून घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून मी आयोगाला म्हटलं की, मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी दिली आहे. आता मी थांबतो. अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.


       
Tags: Bhima KoregaobjpMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मिस्टर अँड मिसेस आंबेडकरांचा साधेपणा !

Next Post

महाविकास आघाडी मजबूत राहील!

Next Post
महाविकास आघाडी मजबूत राहील!

महाविकास आघाडी मजबूत राहील!

भूमिहीन हक्क संरक्षण समितीची पुढील ऐतिहासिक भूमिका व दिशा ठरविणारे शिबीर
चळवळीचा दस्तऐवज

भूमिहीन हक्क संरक्षण समितीची पुढील ऐतिहासिक भूमिका व दिशा ठरविणारे शिबीर

दस्तऐवज चळवळीचा ३७ वर्षांपूर्वीचा...(पार्श्वभूमी ― मागील ५५-६० वर्षांतील ब-याच दस्तऐवजांच्या फाईल्स, हस्तलिखित नोट्स, रिपोर्ट्स, फोटो, लेख, बातम्या, विशेषांक, आदी माझ्याकडे ...

June 24, 2025
वैष्णवी हगवणे/कस्पटे हत्या : आधी कोपर्डीचे सांगा! मग ठरावाचे बोला!
विशेष

वैष्णवी हगवणे/कस्पटे हत्या : आधी कोपर्डीचे सांगा! मग ठरावाचे बोला!

कोपर्डीतील तरुणीच्या हत्येनंतरचे मराठा जनतेचे शिस्तबध्द विराट क्रांती मोर्चे झाले. आणि आता मराठ्यांच्या सभांचे नेते मनोज जरांगे पाटील फक्त आणि ...

June 24, 2025
वंचित बहुजन युवा आघाडीची अकोल्यात युवतींसाठी पहिली शाखा सुरू
बातमी

वंचित बहुजन युवा आघाडीची अकोल्यात युवतींसाठी पहिली शाखा सुरू

अकोला : वंचित बहुजन युवा आघाडीने अकोला शहरात युवती आणि महिलांसाठी आपली पहिली शाखा पंचशील नगर बायपास येथे मोठ्या उत्साहात ...

June 24, 2025
'घे भरारी तुझ्या स्वप्नांची' - दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
बातमी

‘घे भरारी तुझ्या स्वप्नांची’ – दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

विरार-वसई : वंचित बहुजन महिला आघाडी, विरार-वसई महानगरपालिका क्षेत्र आणि शिवशाही भिमशाही उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'घे भरारी तुझ्या ...

June 24, 2025
रणबीर कपूरचा 'रामायण'मध्ये काम करण्यास नकार; म्हणाला, "सरासरी भूमिका नको!"
बातमी

रणबीर कपूरचा ‘रामायण’मध्ये काम करण्यास नकार; म्हणाला, “सरासरी भूमिका नको!”

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या बहुप्रतिक्षित चित्रपटात भूमिका करण्यास नकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीरला रामाच्या ...

June 24, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क