Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

जाती अंताशिवाय भारत जोडला जाणे अशक्य – ॲड. आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 3, 2022
in राजकीय
0
जाती अंताशिवाय भारत जोडला जाणे अशक्य – ॲड. आंबेडकर
0
SHARES
212
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

नांदेड मधील धम्म मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद !

नांदेड – देशातील जाती व्यवस्था हजारो वर्षांपासून टिकून आहे. येथील जाती व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय भारत जोडला जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

नांदेड येथील नवा मोंढा मैदानावर ५ नोव्हेंबर रोजी धम्म मेळावा पार पडला. यावेळी अंजली आंबेडकर, रेखा ठाकूर, अशोक सोनोने, फारुख अहमद, अमित भुईगळ, नांदेडचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबरे, शिवा नरंगले, भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड जिल्हाध्यक्ष निवृत्त न्यायाधीश यशवंत चावरे, यांच्यासह अनेकांची विचारपीठावर उपस्थिती होती.

ऍड. आंबेडकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देशाला तोडू पाहत असून येथील माणसाची डोकी भडकविण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. मोहन भागवत हे हिंदू धर्माला वैदिक धर्माकडे घेऊन जात असून सनातनी मानसिकता घडवू पाहत आहे. भारताला अफगाणिस्तानला जोडणे म्हणजे बॉम्ब ब्लास्ट संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न तर मोहन भागवत करत नसावे ना? असा सवाल अॅड. आंबेडकर यांनी केला.

राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा काढत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, मात्र येथील भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम त्यांनी करावे, केवळ पायी चालून उपयोग होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. देशात आरक्षण वाचविण्याचे थोतांड नाटक सुरू असून भाजपने कोर्टाच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपवले. आगामी काळात पैसे वाटून निवडणुका जिंकणाऱ्या पुढाऱ्यांची व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय पर्याय नाही. तोपर्यंत वंचित समूहाची सत्ता येणार नसल्याचे अॅड. आंबेडकर यांनी आवर्जून सांगितले. भाजपनं पाम तेलात ४५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, याबाबत राहुल गांधी यांनी मुद्दा उपस्थित करायला हवा. भाजप सरकार हे सामान्यांचे नसून लुटारू असल्याचा घणाघात ही आंबेडकर यांनी केला.

राज्यातील शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीला येथील शेतकरीच जबाबदार असून शेतकऱ्यांनी जातीच्या सत्तेला महत्व दिल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. शेटजी आणि भटजी हे मुद्दाम ऊस असो किंवा कापूस यास भाव देत नसल्याने कापूस व ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, त्याच शेतकऱ्यांच्या भरवश्यावर इथेनॉलमधून कारखानदार गब्बर होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन ३ हजार भाव द्यावा, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले.

१. केंद्राचे चुकीचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक. आफ्रिकेतून मुबलक प्रमाणात कापसाची आयात केली जात आहे. त्यामुळे कापसाला भाव मिळत नाही. आयात बंद केली तर कापसाचे भाव वाढू शकतात. कापूस, उसाला भाव नाहीत, पण या विषयावर कोणी बोलायला तयार नाही.

२. ३७० कलम रद्द केल्यानंतर मलेशियाने ही कृती मान्य केली नाही. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाकडून पाम तेलाची आयात बंद केली. यात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातही मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे.

३. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पदयात्रा काढण्यापेक्षा देशातील कष्टकरी, मजूर, शेतकरी आणि सामान्यांचे प्रश्न पंतप्रधानांना विचारावेत, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला.

४. दलित, मुस्लिम, आदिवासी असे उच्चारून समानता नसल्याचेच आपण दाखवितो. त्यामुळे समानता आणण्यासाठी विधायक प्रयत्नांची गरज आहे. या देशात तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी ओबीसींना आरक्षण दिले. पण, शेठजी-भटजीच्या सरकारने हे आरक्षण काढण्याचा घाट घातल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.


       
Tags: Bharat Jodo YatraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

रामलिंग टेकाळे यांचे निधन

Next Post

EWS आरक्षण बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर

Next Post
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई

EWS आरक्षण बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर

Pune Station : पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव द्या ; वंचित बहुजन आघाडीची मागणी!
बातमी

Pune Station : पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव द्या ; वंचित बहुजन आघाडीची मागणी!

पुणे : शहराचे नाव बदलण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, आता पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात ...

June 25, 2025
Latur : वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर कारवाईची मागणी
बातमी

Latur : वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर कारवाईची मागणी

लातूर : लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल वापरलेल्या ...

June 25, 2025
Latur : वंचित बहुजन आघाडीकडून रेणापूर येथे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन!
बातमी

Latur : वंचित बहुजन आघाडीकडून रेणापूर येथे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन!

लातूर : वंचित बहुजन आघाडी, रेणापूर तालुक्याच्यावतीने रेणापूर तहसील कार्यालयात विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील ...

June 25, 2025
Parbhani : मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!
Uncategorized

Parbhani : मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

परभणी : मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढताना दिसत आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ...

June 25, 2025
Pimpri Chinchwad : धक्कादायक! पत्नीला आणि प्रियकराला एकत्र पाहून पतीकडून हत्या
बातमी

Pimpri Chinchwad : धक्कादायक! पत्नीला आणि प्रियकराला एकत्र पाहून पतीकडून हत्या

पिंपरी-चिंचवड : देहू रोड परिसरात एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहून संतापाच्या भरात दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली ...

June 25, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क