मुंबई : शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कथित पोलीस कोठडीतील हत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य मानवी हक्क आयोगात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची आज सुनावणी पार पडली.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून कोणताही प्रतिनिधी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी आयोगासमोर करण्यात आली. (Somnath Suryawanshi Murder Case)
Also Read : भूमिगत गटार कामाची नगरसेवक सचिन गायकवाड यांच्याकडून पाहणी; दर्जेदार कामासह रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचना
सुनावणीसाठी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी या स्वतः उपस्थित होत्या. त्यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी आयोगासमोर बाजू मांडली.
राज्य मानवी हक्क आयोगाने पुढील सुनावणीत त्या संदर्भात निर्णय घेण्याचे सांगितले असून पुढील सुनावणी १ जुलै रोजी होणार आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात न्याय मिळावा आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य मदत मिळावी, यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (Somnath Suryawanshi Murder Case)





