मनमाड : छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ रोजी रायगडावर सार्वभौम राजा म्हणून झालेला राज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण मानला जातो. हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर रयतेच्या स्वराज्याच्या स्थापनेचा आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या अधिकृत प्रारंभाचा ऐतिहासिक दिवस होता.
या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी, मनमाड शहराच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष विलास आहिरे व शहर उपाध्यक्ष सागर गाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच, सामाजिक विचारवंत कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे पक्षाच्या वतीने जाहीर वाटप करण्यात आले. यामागील उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, विचार आणि लोकाभिमुख राज्यकारभार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा होता. या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, ज्येष्ठ नेते दीपक साळवे, महासचिव अमोल केदारे, अनिल कांबळे, राकेश पगारे, काकासाहेब भालेराव, सुनील बागुल, खुशाल थोरात, किरण पगारे, महेश जगताप, रुपेश जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





