पुणे : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या नीटचा पेपर फुटल्यानंतर देशातील शिक्षणव्यवस्थेचा भोंगळ कारभार आता समोर आला आहे. या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या २९ मे रोजी वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे.
नीट पेपर फुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रासाचा सामना करावा लागला. परिणामी, देशभरातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.पेपरफुटी प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्यात आला.
राजस्थान, हरियाणापासून सुरू झालेल्या या प्रकरणाचे महाराष्ट्रात व्यापक धागेदोरे असल्याचे स्पष्ट झाले. विद्यार्थी आणि पालकांसह सामान्य नागरिकांकडून शिक्षणमंत्र्यांवर रोष व्यक्त केला जात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाची ही पहिलीच वेळ नाही. 2024 मध्ये देखील अशीच नीट पेपरफुटी झाली होती.






