मुंबई : मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर महिला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार असून स्मृती मंधाना उप-कर्णधाराची जबाबदारी सांभाळणार आहे.
१२ जून ते ५ जुलै दरम्यान इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा समावेश गट-१ मध्ये करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान यांसारख्या मजबूत संघांमुळे हा गट ‘ग्रुप ऑफ डेथ’ मानला जात आहे.
भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव
गट-१: ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स
गट-२: वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड
१४ जूनला भारत-पाकिस्तान महामुकाबला एजबॅस्टन येथे रंगणार असून या सामन्याकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





