पुणे : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन पुण्यातील कलाकार कट्टा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सामूहिक वाचनात सहभाग घेत इतिहास, सामाजिक भान आणि विचारप्रबोधनाचा संदेश दिला. या उपक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांचे नेतृत्व लाभले. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सामूहिक वाचनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा चिकित्सक अभ्यास समाजापर्यंत पोहोचवण्याचा आणि विचारजागृती घडवण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमामुळे पुण्यात वैचारिक चळवळीला बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, युवा आघाडी प्रदेश सदस्य विशाल गवळी, शहर उपाध्यक्ष दीपक ओहोळ, जॉर्ज मदनकर, शहर सचिव प्रा. बी. पी. साळवे, शहर संघटक शाम गोरे, नागेश भोसले, महिला आघाडी अध्यक्षा अनिता चव्हाण, महिला आघाडी महासचिव ॲड. रेखा चौरे, सारिका फडतरे, निरंजना सोनवणे, लीना वानखेडे, शिवाजीनगर अध्यक्ष प्रभाकर सरोदे, पर्वती विधानसभा अध्यक्ष ॲड. रवींद्र गायकवाड, कोथरूड विधानसभा अध्यक्ष दीपक कांबळे, अमोल जगताप, शहर उपाध्यक्ष परमेश्वर सनादे, रफिक शेख, मोहन कदम, प्रभू पटेकर, ओंकार कांबळे, मुक्तेश्वर माने, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकारामजी डावरे, माथाडी शहर सरचिटणीस चंद्रकांत कांबळे, रितेश गायकवाड, राहुल दहिरे, महिला आघाडी उपाध्यक्षा प्रतिमा कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन अध्यक्ष चैतन्य इंगळे, महासचिव अधिराज कांबळे, युवा आघाडी सदस्य इंगळे काका, सतीश साबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





