Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आता आधार असेल तरच रेल्वेच तात्काळ तिकिट – रेल्वेचा निर्णय

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 12, 2025
in बातमी
0
आता आधार असेल तरच रेल्वेच तात्काळ तिकिट – रेल्वेचा निर्णय
       

मुंबई – रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. या प्रक्रियेमध्ये 3 मोठे बदल केल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. यामध्ये भारतीय रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमातील बदल 1 जुलैपासून लागू करण्याचा निर्णय घेतला असून आता आधार असेल तरच रेल्वेचे तात्काळ तिकिट काढता येणार आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे.

यंदा तात्काळ तिकिट बुकिंगच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. हे बदल 1 जुलैपासून लगू होणार आहेत. या नियमांनुसार 1 जुलैपासून आयआरसीटीसी खातं आधार प्रमाणीकरण असेल त्यांनाच तात्काळ तिकिट काढता येणार आहे. तसेच 15 जुलैपासून आधार ओटीपी द्वारे पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतर तात्काळ तिकीट बुकींग करता येणाक आहे. तात्कळ तिकिट बुकिंगमध्ये फार मोठी हेराफेरी केली जात होती. तसेच या प्रक्रियमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार केला जात होता. अशा तक्रारी प्रवाशांकडून सातत्यानं केल्या जात होत्या. याची दखल घेऊन अखेर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या तात्काळ तिकिटांच्या प्रक्रियेमध्ये नवे बदल जाहीर केले आहेत.

रेल्वेच्या तात्काळ तिकिट काढण्यासाठी आता 1 जूलै पासून निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रामाणिक प्रवाशांचे हित जपले जाणार आहे. यासाठीच भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट आरक्षण प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले असल्याचे सांगितले आहे. या सुधारणा प्रामाणिक प्रवाशांच्या फायद्याच्या ठरणार आहेत. आगामी काळात तिकिट काढण्याची प्रक्रिया अधिक काटेकोर होणार आहे. त्यामुळे तात्काळ तिकिटांचा काळाबाजार कमी होईल अशी सर्व सामान्य प्रवाशांना आशा आहे.


       
Previous Post

मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी १८ जुलैपासून – उच्च न्यायालय

Next Post

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात, विमानात २४२ प्रवासी

Next Post
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात, विमानात २४२ प्रवासी

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात, विमानात २४२ प्रवासी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
रक्षाबंधनानिमित्त वंचित महिला आघाडीचा अनोखा उपक्रम; पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची आठवण‎
बातमी

रक्षाबंधनानिमित्त वंचित महिला आघाडीचा अनोखा उपक्रम; पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची आठवण‎

by mosami kewat
August 16, 2025
0

पुणे : उत्तम नगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या खडकवासला विधानसभा शाखेने अनोख्या पद्धतीने पोलिसांना...

Read moreDetails
independence day : दापोलीत ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या योगदानावर व्याख्यान

independence day : दापोलीत ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या योगदानावर व्याख्यान

August 16, 2025
लातूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

लातूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2025
अकोल्यात धनगर समाजातील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

अकोल्यात धनगर समाजातील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

August 15, 2025
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे माचैल माता यात्रेदरम्यान 45 भाविकांचा मृत्यू, 70 हून अधिक बेपत्ता

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे माचैल माता यात्रेदरम्यान 45 भाविकांचा मृत्यू, 70 हून अधिक बेपत्ता

August 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home