Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महिलांनी राजकारणात सक्रीय झालं पाहिजे – रेखाताई ठाकूर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 8, 2024
in बातमी
0
वंचित आघाडी महाविकास आघाडीत जाहीर करणे ही निव्वळ धूळफेक आहे – रेखा ठाकूर
0
SHARES
78
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

यवतमाळ : रमाईने ज्या सामाजिक क्रांतीसाठी त्याग केला, ती सामाजिक क्रांती पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी सर्व समाजातील महिलांनी राजकारणात सक्रिय झाले पाहिजे असं मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे रमाई जयंती निमित्त आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक महिला परिषदा घेतल्या. महिला शिकलेल्या नाहीत, यांना काय राजकारण कळणार? असे त्यांनी कधीही म्हटलेले नाही. राजकारणात महिलांना सक्रिय झाल्याशिवाय, महिलांना वैचारिकदृष्ट्या जागृत केल्याशिवाय आपली सामाजिक क्रांती यशस्वी होणार नाही याची जाणीव बाबासाहेबांना होती. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाड येथील महिला परिषदेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश घेऊन महिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्या. त्या महिलांमधून अनेक रमाई निर्माण झाल्या. याच रमाईंनी महाराष्ट्रातील एक पिढी घडवली आहे. समाजातील एक उच्चशिक्षित आणि क्रांतिकारी, विचारांशी एकनिष्ठ कार्यकर्ता इथल्या रमाईंनी निर्माण केला आहे. त्या प्रत्येकाच्या घरात आणि विचारात रमाई असल्याचे त्यांनी नमूद केले.

जो समाज हजारो वर्ष दुःख यातना भोगत आहे, त्या समाजाच्या मुक्तीसाठी बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात गेले होते, याची पूर्ण जाणीव माता रमाईला होती. म्हणून, रमाई यांनी स्वतःच्या दुःखाचे अवडंबन न करता बाबासाहेबांच्या पाठिशी आपण कसे उभे राहू, हाच त्यांचा निर्धार होता असेही त्यांनी म्हटले आहे.


       
Tags: ramaiambedkarrekhathakurVanchit Bahujan AaghadiYavatmal
Previous Post

औरंगाबाद शहरात मोठ्या उत्साहात रमाई जयंती साजरी.

Next Post

रमाईच्या त्यागातून निर्माण झालेली सामाजिक क्रांती गतीमान करण्याची गरज – बाळू टेंभुर्णे

Next Post
रमाईच्या त्यागातून निर्माण झालेली सामाजिक क्रांती गतीमान करण्याची गरज – बाळू टेंभुर्णे

रमाईच्या त्यागातून निर्माण झालेली सामाजिक क्रांती गतीमान करण्याची गरज - बाळू टेंभुर्णे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क