अकोला : महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्ह्यात ‘कृषी दिन’ साजरा केला. या निमित्ताने अकोला, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूरसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतात जाऊन शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा बांधावरच सत्कार करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांना शाल, टोपी आणि हार घालून सन्मानित करण्यात आले. यासोबतच महानायक वसंतराव नाईक यांचा फोटो भेट म्हणून देण्यात आला.
पातूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन जिल्हा आणि तालुका पातळीवरील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचा विशेष सत्कार केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे आणि वसंतराव नाईक यांच्या कार्याची आठवण करून देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
पिंपरीत किवळे-रावेत मेट्रो मार्गाच्या DPR साठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक शहर आहे. औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि...
Read moreDetails






