Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

“ओबीसींचा आवाज दाबण्यासाठीच मुंबईत जमावबंदी” बाळासाहेब आंबेडकर ओबीसी आरक्षण मोर्चावर ठाम.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 22, 2021
in बातमी, राजकीय
0
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई
0
SHARES
431
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्यांनी आधी गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित केले, आता ओबीसींचे आरक्षण घालवत असल्याचा आरोप.

मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी २३ डिसेंबर रोजी मुंबई विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले.

सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती न दिल्यामुळे सरकारची याचिका फेटाळण्यात आली. यामुळे निवडणुकीत ओबीसींना हक्काच्या २७% जागांपासून वंचित राहावे लागणार आहे. ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व संपवण्यात आले आहे. इतर काही राज्यांतही अशाच प्रकारे ओबीसीचे राजकीय आरक्षण स्थगित करण्यात आलेले आहे.

आताचा निकाल राजकीय आरक्षणावर असला तरी त्याच धर्तीवर शिक्षण व नोकर्यांतील आरक्षण संपवलं जाऊ शकतं, त्यामुळे ओबीसींचे संपूर्ण अरक्षणच धोक्यात आले आहे असे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले. यासाठी केंद्र व राज्य दोन्ही सरकारे जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्राने त्यांच्याकडे असलेला एमपीरिकल डेटा देण्यास नकार दिला. राज्य सरकारनेही स्वतः एमपीरिकल डेटा गोळा केला नाही. या दोघांच्या ओबीसी विरोधी मानसिकतेमुळे त्यांनी ओबीसींचे आरक्षण रद्द होईल अशीच भूमिका घेतली. सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्याने आधी गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित केले, आणी आता ओबीसींना ही अरक्षणापासून वंचित करत असल्याचा आरोप यावेळी बाळासाहेबांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच महाराष्ट्र सरकारने राज्यभर जमावबंदी लागू केली. ओबीसींचा आवाज दाबण्यासाठीच महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्था ठीक असल्यामुळे जमावबंदीची काहीच गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही सरकारने जमावबंदी मागे घेतली नाही तर जमावबंदी मोडून ओबीसी आरक्षणाचा मोर्चा निघेल असे त्यांनी जाहीर केले.


       
Tags: CongressNCPobcPrakash AmbedkarreservationShivsenaVanchit Bahujan Aaghadiआरक्षणओबीसीकाँग्रेसप्रकाश आंबेडकरराष्ट्रवादीशिवसेना
Previous Post

स्टॅन्ड-अप कॉमेडी : ब्राह्मणी साच्यातली विनोद बुद्धी

Next Post

जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!!!

Next Post
जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!!!

जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!!!

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी
बातमी

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी

कोल्हापूर : कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाच्या घरावर ईडीची धाक पडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आले. भरत लठ्ठे नाव असून ते ...

June 21, 2025
Crime news: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या
बातमी

Crime News: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या

नवी मुंबई : मस्करीची कुस्करी झाली. तुर्भे येथील धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आली. ही घटना ...

June 21, 2025
IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा ; ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

पुणे : पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बँकिंग क्षेत्रातील परीक्षा घेणाऱ्या संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल ...

June 21, 2025
Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर
बातमी

Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्राचे ओबीसी नेते, माजी खासदार आणि विधानसभेचे विरोधी ...

June 21, 2025
कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!
बातमी

कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!

चंद्रपूर : बांधकाम कामगारांना 90 दिवसांच्या नोंदणीवर नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ग्रामसेवकांकडून होणाऱ्या टाळाटाळीविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने चंद्रपूर जिल्हा ...

June 20, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क