Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

“ओबीसींचा आवाज दाबण्यासाठीच मुंबईत जमावबंदी” बाळासाहेब आंबेडकर ओबीसी आरक्षण मोर्चावर ठाम.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 22, 2021
in बातमी, राजकीय
0
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई
       

सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्यांनी आधी गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित केले, आता ओबीसींचे आरक्षण घालवत असल्याचा आरोप.

मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी २३ डिसेंबर रोजी मुंबई विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले.

सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती न दिल्यामुळे सरकारची याचिका फेटाळण्यात आली. यामुळे निवडणुकीत ओबीसींना हक्काच्या २७% जागांपासून वंचित राहावे लागणार आहे. ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व संपवण्यात आले आहे. इतर काही राज्यांतही अशाच प्रकारे ओबीसीचे राजकीय आरक्षण स्थगित करण्यात आलेले आहे.

आताचा निकाल राजकीय आरक्षणावर असला तरी त्याच धर्तीवर शिक्षण व नोकर्यांतील आरक्षण संपवलं जाऊ शकतं, त्यामुळे ओबीसींचे संपूर्ण अरक्षणच धोक्यात आले आहे असे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले. यासाठी केंद्र व राज्य दोन्ही सरकारे जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्राने त्यांच्याकडे असलेला एमपीरिकल डेटा देण्यास नकार दिला. राज्य सरकारनेही स्वतः एमपीरिकल डेटा गोळा केला नाही. या दोघांच्या ओबीसी विरोधी मानसिकतेमुळे त्यांनी ओबीसींचे आरक्षण रद्द होईल अशीच भूमिका घेतली. सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्याने आधी गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित केले, आणी आता ओबीसींना ही अरक्षणापासून वंचित करत असल्याचा आरोप यावेळी बाळासाहेबांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच महाराष्ट्र सरकारने राज्यभर जमावबंदी लागू केली. ओबीसींचा आवाज दाबण्यासाठीच महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्था ठीक असल्यामुळे जमावबंदीची काहीच गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही सरकारने जमावबंदी मागे घेतली नाही तर जमावबंदी मोडून ओबीसी आरक्षणाचा मोर्चा निघेल असे त्यांनी जाहीर केले.


       
Tags: CongressNCPobcPrakash AmbedkarreservationShivsenaVanchit Bahujan Aaghadiआरक्षणओबीसीकाँग्रेसप्रकाश आंबेडकरराष्ट्रवादीशिवसेना
Previous Post

स्टॅन्ड-अप कॉमेडी : ब्राह्मणी साच्यातली विनोद बुद्धी

Next Post

जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!!!

Next Post
जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!!!

जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!!!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध "खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!"
बातमी

गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”

by Tanvi Gurav
July 17, 2025
0

गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...

Read moreDetails
UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

July 17, 2025
सानपाडा येथील बस स्थानकासमोर कित्येक महिन्यांपासून उघड्यावर असलेला धोकादायक चेंबर अखेर झाकण्यात आला आहे. या खुल्या चेंबरमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता. वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई आणि पत्रकार विष्णू बुरे, सचिन पुटगे व रंजित तायडे यांनी या समस्येकडे लक्ष वेधत एक वेगळी पद्धत अवलंबली. त्यांनी चेंबरच्या ठिकाणी अनोख्या पद्धतीने पूजा करून प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाची दखल घेत संबंधित विभागाने तत्काळ कारवाई करत काल रात्री चेंबरवर झाकण बसवले. या सकारात्मक निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, वंचित बहुजन आघाडी व सजग पत्रकारांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संबंधित विभागाचे मनःपूर्वक आभार तसेच जागरूक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सानपाड्यातील धोकादायक चेंबरला झाकण बसवले; वंचित बहुजन आघाडी व पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश

July 17, 2025
कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

July 17, 2025
सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

July 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home