Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

“ओबीसींचा आवाज दाबण्यासाठीच मुंबईत जमावबंदी” बाळासाहेब आंबेडकर ओबीसी आरक्षण मोर्चावर ठाम.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 22, 2021
in बातमी, राजकीय
0
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई
       

सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्यांनी आधी गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित केले, आता ओबीसींचे आरक्षण घालवत असल्याचा आरोप.

मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी २३ डिसेंबर रोजी मुंबई विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले.

सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती न दिल्यामुळे सरकारची याचिका फेटाळण्यात आली. यामुळे निवडणुकीत ओबीसींना हक्काच्या २७% जागांपासून वंचित राहावे लागणार आहे. ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व संपवण्यात आले आहे. इतर काही राज्यांतही अशाच प्रकारे ओबीसीचे राजकीय आरक्षण स्थगित करण्यात आलेले आहे.

आताचा निकाल राजकीय आरक्षणावर असला तरी त्याच धर्तीवर शिक्षण व नोकर्यांतील आरक्षण संपवलं जाऊ शकतं, त्यामुळे ओबीसींचे संपूर्ण अरक्षणच धोक्यात आले आहे असे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले. यासाठी केंद्र व राज्य दोन्ही सरकारे जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्राने त्यांच्याकडे असलेला एमपीरिकल डेटा देण्यास नकार दिला. राज्य सरकारनेही स्वतः एमपीरिकल डेटा गोळा केला नाही. या दोघांच्या ओबीसी विरोधी मानसिकतेमुळे त्यांनी ओबीसींचे आरक्षण रद्द होईल अशीच भूमिका घेतली. सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्याने आधी गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित केले, आणी आता ओबीसींना ही अरक्षणापासून वंचित करत असल्याचा आरोप यावेळी बाळासाहेबांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच महाराष्ट्र सरकारने राज्यभर जमावबंदी लागू केली. ओबीसींचा आवाज दाबण्यासाठीच महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्था ठीक असल्यामुळे जमावबंदीची काहीच गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही सरकारने जमावबंदी मागे घेतली नाही तर जमावबंदी मोडून ओबीसी आरक्षणाचा मोर्चा निघेल असे त्यांनी जाहीर केले.


       
Tags: CongressNCPobcPrakash AmbedkarreservationShivsenaVanchit Bahujan Aaghadiआरक्षणओबीसीकाँग्रेसप्रकाश आंबेडकरराष्ट्रवादीशिवसेना
Previous Post

स्टॅन्ड-अप कॉमेडी : ब्राह्मणी साच्यातली विनोद बुद्धी

Next Post

जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!!!

Next Post
जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!!!

जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!!!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
बातमी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

by mosami kewat
April 11, 2026
0

उस्मानाबाद : क्रांतीसूर्य, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांची १९९वी जयंती परंडा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात...

Read moreDetails
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026
कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

April 11, 2026
समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

April 11, 2026
सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home