हिंगोली : जिल्हा परिषद प्रशाला, शिरडशहापूर येथील शिक्षकांच्या गंभीर तुटवड्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा समन्वयक समाजरत्न अनिल कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पाठपुराव्यातून शाळेला तब्बल ६ नवीन शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
गेल्या काही काळापासून शिरडशहापूर येथील जिल्हा परिषद शाळेत पुरेशा प्रमाणात शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचा प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येची गांभीर्याने दखल घेत अनिल कांबळे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे शाळेतील शिक्षकांची कमतरता दूर झाली असून विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनाचा मार्ग सुकर झाला आहे.
Also Read : COEP च्या ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या पाठपुराव्याला यश; ५ विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या प्रवेशाची परवानगी
शिक्षक मिळाल्याबद्दल शिरडशहापूरच्या शाळा व्यवस्थापन आणि गावकऱ्यांच्या वतीने अनिल कांबळे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. “शिरडशहापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सदैव कटिबद्ध राहील,” असा विश्वास यावेळी पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
‘जय भीम Gen Z!’: वंचित बहुजन आघाडीचा नवा उपक्रम
मुंबई : वंचित बहुजन आघाडी (VBA) ने फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि तरुण पिढीला जोडण्यासाठी 'Jai Bhim Gen Z!'...
Read moreDetails






