Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मग आम्ही बी टीम कसे? ‘मतचोरी’च्या आरोपांवरून वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसवर हल्लाबोल; ‘कोर्टात जाण्याची हिंमत का नाही?’

mosami kewat by mosami kewat
August 25, 2025
in बातमी
0
मग आम्ही बी टीम कसे? ‘मतचोरी’च्या आरोपांवरून वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसवर हल्लाबोल; ‘कोर्टात जाण्याची हिंमत का नाही?’
       

मुंबई : देशभरात आणि राज्यात सुरू असलेल्या ‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन युवा आघाडीने काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार पलटवार केला आहे. वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून, निवडणूक घोटाळ्यासाठी वंचित आघाडीला ‘बी टीम’ म्हणणे हा निव्वळ अपप्रचार असल्याचे म्हटले आहे.

राजेंद्र पातोडे यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे गंभीर आरोप केले असले, तरी ते किंवा त्यांचे राज्यातील नेते न्यायालयात याचिका दाखल करायला का तयार नाहीत, असा सवाल पातोडे यांनी विचारला आहे. महाराष्ट्रात एक कोटी ‘रहस्यमय मतदार’ असल्याचा दावा करूनही, काँग्रेसने केवळ आंदोलनात्मक मोहीम चालवली आणि न्यायालयाचा मार्ग का निवडला नाही, यावर त्यांनी बोट ठेवले.

मताची चोरी सत्ताधाऱ्यांकडूनच शक्य

निवडणुका मॅनेज करणे, बोगस मतदारांची नोंदणी करणे किंवा ईव्हीएममध्ये गैरव्यवहार करणे हे केवळ सत्ताधारी पक्षांनाच शक्य आहे. आम्ही तर केंद्रात किंवा राज्यात सत्तेत नव्हतो, मग आम्हाला ‘बी टीम’ कसे म्हटले जाते, असा सवाल पातोडे यांनी केला. ते म्हणाले, “वंचित आघाडीवर ‘बी टीम’ असल्याचा आरोप मुद्दाम केला जातो, जेणेकरून बोगस मतदार, मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळ्यासारखे गंभीर मुद्दे लोकांसमोर येऊ नयेत.”

भाजप-काँग्रेस एकमेकांच्या ‘बी टीम’

राजेंद्र पातोडे यांनी पुढे म्हटले की, जर काँग्रेसकडे निवडणुकीतील गैरव्यवहाराचे पुरावे असतील, तर त्यांनी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली नाही? ईव्हीएमचा मुद्दा न्यायालयात आल्यास निकाल बदलतो, हे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना चांगलेच माहीत आहे, म्हणूनच ते न्यायालयीन लढाई टाळत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मते, भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष कधी एकमेकांचे ‘बी टीम’ म्हणून काम करतात. पातोडे म्हणाले, “देशात आणि राज्यात भाजप कधी काँग्रेसची ‘बी टीम’ म्हणून काम करते, तर कधी काँग्रेस भाजपची ‘बी टीम’ असते. बाकीच्या सर्व गोष्टी केवळ अंधश्रद्धा आहेत.”

निवडणुका जिंकणारी महायुती आणि हारणारी महाविकास आघाडी, यांच्या अपयशासाठी वंचित बहुजन आघाडीला जबाबदार धरणे हे चुकीचे असून, हे एक उघड सत्य आहे की निवडणुका मॅनेज पद्धतीने, बोगस मतदारांच्या आधारे होत असतील तर वंचित बहुजन आघाडीला ‘बी टीम’ म्हणणे हे तर्कहीन आहे, असे राजेंद्र पातोडे यांनी ठामपणे सांगितले.


       
Tags: Anjali AmbedkarbjpCongresElectionElection commissionindiaMaharashtrapoliticsPrakash AmbedkarSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindiavote
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर ॲट्रॉसिटी दाखल करा; वंचित बहुजन आघाडी

Next Post

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटील यांना सवाल; गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का?

Next Post
प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटील यांना सवाल; गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का?

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटील यांना सवाल; गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही!  धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान
बातमी

आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही!  धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान

by mosami kewat
March 23, 2026
0

नागपूर : आरएसएसच्या मुख्यालयावर आज विशाल संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश...

Read moreDetails
भारताचे सार्वभौमत्व गमावलेले संघाचे मोदी!

भारताचे सार्वभौमत्व गमावलेले संघाचे मोदी!

March 23, 2026
खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-३

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-३

March 23, 2026
आरएसएस मुख्यालय घेराव ; ॲड. प्रकाश आंबेडकर ने उठाए राफेल और विदेश नीति पर बड़े सवाल

आरएसएस मुख्यालय घेराव ; ॲड. प्रकाश आंबेडकर ने उठाए राफेल और विदेश नीति पर बड़े सवाल

March 23, 2026
नागपुरात 23 मार्चला आरएसएस मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचा शांततापूर्ण मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवालांचा भडिमार

नागपुरात 23 मार्चला आरएसएस मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचा शांततापूर्ण मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवालांचा भडिमार

March 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home