Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

शिक्षण सेवकांना न्याय कधी? आर्थिक सुरक्षिततेसाठी ‘शिक्षण सेवक योजना’ रद्द करा – वंचित बहुजन आघाडी

mosami kewat by mosami kewat
September 7, 2025
in Uncategorized, बातमी
0
शिक्षण सेवकांना न्याय कधी? आर्थिक सुरक्षिततेसाठी 'शिक्षण सेवक योजना' रद्द करा - वंचित बहुजन आघाडी

शिक्षण सेवकांना न्याय कधी? आर्थिक सुरक्षिततेसाठी 'शिक्षण सेवक योजना' रद्द करा - वंचित बहुजन आघाडी

       

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांपासून लागू असलेली ‘शिक्षण सेवक योजना’ नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप करत ही योजना तातडीने रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’चे राष्ट्रीय खजिनदार महेश भारतीय यांनी राज्य सरकारकडे यासंदर्भात निवेदन सादर केले असून, ‘समान कामासाठी, समान वेतन’ या तत्त्वावर आधारित कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची मागणी केली आहे.

काय आहे शिक्षण सेवकांची व्यथा?

सद्यस्थितीत लागू असलेल्या या योजनेअंतर्गत शिक्षकांना तीन वर्षांचा ‘शिक्षण सेवक काळ’ पूर्ण करावा लागतो. या काळात त्यांना अत्यल्प मानधन दिले जाते. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणारे विविध भत्ते, पेन्शन, पीएफ आणि वार्षिक वेतनवाढीसारखे लाभ त्यांना मिळत नाहीत, त्यामुळे आर्थिक आणि मानसिक तणावाखाली त्यांना काम करावे लागते.

  • अल्प मानधन : तीन वर्षांसाठी मिळणारे मानधन हे कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे नसते.
  • आर्थिक लाभांचा अभाव : या काळात पेन्शन, पीएफ, वैद्यकीय विमा यांसारखे महत्त्वाचे लाभ मिळत नाहीत.
  • नोकरीतील अस्थिरता: तीन वर्षांच्या करारामुळे नोकरी कायमस्वरूपी आहे की नाही, याबाबत एक प्रकारची अनिश्चितता असते.
  • दूरच्या नियुक्तीचा त्रास : अनेक शिक्षकांची नियुक्ती त्यांच्या मूळ ठिकाणापासून हजारो किलोमीटर दूर होते, ज्यामुळे प्रवास, निवास आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा ताण वाढतो.
  • ज्येष्ठतेचे नुकसान : शिक्षण सेवक काळातील सेवा ज्येष्ठता आणि वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरली जात नाही, त्यामुळे भविष्यातील आर्थिक लाभांवर परिणाम होतो.

या परिस्थितीमुळे शिक्षक आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मोठ्या दबावाखाली काम करत आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक शिक्षकांची नियुक्ती ३५ ते ४० वयोगटात होत असल्यामुळे शिक्षण सेवक काळ पूर्ण होईपर्यंत त्यांचा सेवेचा मोठा कालावधी कमी होतो.

महेश भारतीय यांनी निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या ‘स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध जगजीत सिंग’ (२०१६) प्रकरणाचा संदर्भ दिला आहे. यासह राजस्थान आणि हरियाणा उच्च न्यायालयांनीही अशा कंत्राटी पद्धतीला असंवैधानिक ठरवले असून, ‘समान कामासाठी समान वेतन’ या तत्त्वाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

भारतीय संविधानातील कलम १४ (समानतेचा अधिकार), १६ (नोकरीत संधीची समानता), २१ (जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार), २३ (मानवी तस्करी आणि वेठबिगारीवर बंदी) आणि ३८ (राज्याचे कल्याणकारी ध्येय) या कलमांचे हे उल्लंघन असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शिक्षक संघटनांच्या प्रमुख मागण्या :

  1. शिक्षण सेवक योजना रद्द करून सुरुवातीपासूनच स्थायी नियुक्ती द्यावी.
  2. योजना कायम ठेवल्यास, मानधन स्थायी वेतनाइतके, करारकाल 3 वरून 1 वर्ष, करारकाळात पेन्शन, पीएफ, भत्ते लागू करावेत.
  3. शिक्षण सेवक काळातील वार्षिक वेतनवाढीची नुकसानभरपाई व 3 वर्षांचा कालावधी वरिष्ठ वेतनश्रेणी व सेवा गणनेत धरावा. (GR 17 जून 2013 प्रमाणे).

या निवेदनाच्या प्रती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.


       
Tags: Anjali AmbedkarMaharashtramumbaiPrakash AmbedkarschoolstudentteacherVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न

Next Post

धानोरा खुर्द (मापारी) येथे बौद्ध बांधवाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

Next Post
धानोरा खुर्द (मापारी) येथे बौद्ध बांधवाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

धानोरा खुर्द (मापारी) येथे बौद्ध बांधवाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
बातमी

नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

by mosami kewat
April 30, 2026
0

Budget 2026 : नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या अर्थसंकल्प बैठकीपूर्वी मनपाच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन 2022 ते 2025...

Read moreDetails
हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

April 28, 2026
मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

April 28, 2026
टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

April 28, 2026
रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

April 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home