Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना बेघर केल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

mosami kewat by mosami kewat
July 29, 2025
in बातमी
0
मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना बेघर केल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना बेघर केल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

       

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज येथे गेल्या तीस वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना ग्रामसभेच्या ठरावाद्वारे बेघर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, वंचित बहुजन आघाडीने या घटनेचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात ग्रामसभा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‎
‎मिळालेल्या माहितीनुसार, निघोज येथील मदारी समाजाची ही 15 कुटुंबे गेली तीन दशके याच गावात राहत आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत त्यांना बेघर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
‎
‎या अन्यायाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आवाज उचलला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव, पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि बेघर झालेल्या मदारी समाजातील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. जाधव यांनी या कृतीला अन्यायकारक ठरवत, तात्काळ बेघर कुटुंबांना न्याय मिळवून देण्याची आणि यास जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‎
‎अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकाचे आणि लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातच असा प्रकार घडल्याने स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.


       
Tags: AhmednagarMadari communitymlavbaforindia
Previous Post

आमदार-खासदार मंत्री झाले की सर्वज्ञच बनतात!

Next Post

शाही जेवणाचं रहस्य

Next Post
शाही जेवणाचं रहस्य

शाही जेवणाचं रहस्य

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
तुमच्या आया- बहिणींचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर देने कितपत योग्य आहे? ही कसली भाषा आहे?
article

तुमच्या आया- बहिणींचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर देने कितपत योग्य आहे? ही कसली भाषा आहे?

by mosami kewat
August 18, 2025
0

राजेंद्र पातोडे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदारांचे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करण्यासंदर्भातील प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. 'तुमच्या आया- बहिणींचं...

Read moreDetails
Akola : वंचित बहुजन आघाडीकडून अकोल्यात कावड भक्तांचे स्वागत

Akola : वंचित बहुजन आघाडीकडून अकोल्यात कावड भक्तांचे स्वागत

August 18, 2025
बार्शीटाकळीत वंचित बहुजन आघाडीची बैठक: निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार

बार्शीटाकळीत वंचित बहुजन आघाडीची बैठक: निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार

August 18, 2025
Pune Monsoon : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाची दमदार वापसी; वाहतूक संथ, यलो अलर्ट जारी

Pune Monsoon : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाची दमदार वापसी; वाहतूक संथ, यलो अलर्ट जारी

August 18, 2025
Shubhanshu Shukla : ‘अॅक्झिअम-४’ मोहीमेतील पायलट शुभांशु शुक्ला यांचे भारतात शानदार स्वागत

Shubhanshu Shukla : ‘अॅक्झिअम-४’ मोहीमेतील पायलट शुभांशु शुक्ला यांचे भारतात शानदार स्वागत

August 18, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home