Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना बेघर केल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

mosami kewat by mosami kewat
July 29, 2025
in बातमी
0
मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना बेघर केल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना बेघर केल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

       

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज येथे गेल्या तीस वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना ग्रामसभेच्या ठरावाद्वारे बेघर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, वंचित बहुजन आघाडीने या घटनेचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात ग्रामसभा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‎
‎मिळालेल्या माहितीनुसार, निघोज येथील मदारी समाजाची ही 15 कुटुंबे गेली तीन दशके याच गावात राहत आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत त्यांना बेघर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
‎
‎या अन्यायाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आवाज उचलला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव, पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि बेघर झालेल्या मदारी समाजातील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. जाधव यांनी या कृतीला अन्यायकारक ठरवत, तात्काळ बेघर कुटुंबांना न्याय मिळवून देण्याची आणि यास जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‎
‎अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकाचे आणि लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातच असा प्रकार घडल्याने स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.


       
Tags: AhmednagarMadari communitymlavbaforindia
Previous Post

आमदार-खासदार मंत्री झाले की सर्वज्ञच बनतात!

Next Post

शाही जेवणाचं रहस्य

Next Post
शाही जेवणाचं रहस्य

शाही जेवणाचं रहस्य

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लिंबे वडगाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बातमी

लिंबे वडगाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

by mosami kewat
July 2, 2026
0

जालना : मंठा तालुक्यातील लिंबे वडगाव येथील पाटोदा साठवण तलाव भूसंपादन प्रकरणातील कथित अनियमितता आणि भूसंपादन अनुदान घोटाळ्याच्या निषेधार्थ वंचित...

Read moreDetails
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

July 2, 2026
सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम

सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम

July 1, 2026
शिक्षणमंत्री दादा भुसे विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन!

शिक्षणमंत्री दादा भुसे विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन!

July 1, 2026
रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

July 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home